भाजपच्या 65 आमदारांना घेऊन विरोधी पक्षनेते गेले अन् थेट माफी मागून आले!

संतापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या 65 आमदारांसह थेट बीएसएफच्या तळावर जाऊन माफी मागितली आहे.
BJP MLA
BJP MLASarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. यावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. याला पश्चिम बंगालनेही (West Bengal) विधानसभेत ठराव मंजूर करून आव्हान दिले आहे. यामुळे संतापलेल्या भाजपच्या (BJP) विरोधी पक्षनेत्यांनी 65 आमदारांसह थेट बीएसएफच्या तळावर जाऊन जाहीर माफी मागितली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंजाबमधील आगामी विधानसभा डोळ्यासमोर बीएसएफचे अधिकारक्षेत्र निर्णय घेतल्याची चर्चा होती. याचबरोबर पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाचीही त्याला किनार असल्याचे बोलले जात होते. यावरून पंजाबनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. बीएसएफ कायद्यानुसार अधिकारक्षेत्र वाढवण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे केंद्र सरकारने केलेली दुरुस्ती चुकीची आहे, असे तृणमूलचे म्हणणे होता. अखेर विधानसभेत हा ठराव मंजूर झाला आहे.

यामुळे संतापलेले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे आज भाजपच्या 65 आमदारांना घेऊन बीएसएफच्या कोलकत्यातील मुख्यालयात पोचले. या वेळी बोलताना ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या काही आमदारांनी बीएसएफबद्दल विधानसभेत चुकीची भाषा वापरली. याबद्दल बीएसएफ अधिकाऱ्यांची माफी मागण्यासाठी आम्ही आलो आहोत. याचबरोबर त्यांच्या देशसेवेबद्दल आम्ही त्यांची आभारही मानतो.

BJP MLA
शशी थरूर संतापले अन् म्हणाले, सिब्बलच खरे काँग्रेसी!

अमित शहांच्या डावावर पंजाब सरकारने नुकताच प्रतिडाव टाकला. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरोधात ठराव मांडण्यात आला होता. ही अधिसूचना राज्याचा अपमान करणारी असून, ती मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारची अधिसूचना नाकारणारा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला होता.

BJP MLA
खबरदार! कोरोनाची लस घेतली नसल्यास आता दारूही मिळणार नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल करण्यात आले आहेत. या भागात तपास करणे, संशयितांना अटक करणे, जप्ती करणे असे अधिकार बीएसएफला मिळाले आहेत. पंजाब, पश्चिम बंगाल व आसाममध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र केवळ 15 किलोमीटर होते. आता सुधारित आदेशानुसार हे क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बीएसएफला तपासणी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com