सुशांत जिवंतपणी जेवढा प्रसिद्ध नव्हता तेवढी प्रसिद्धी त्याला मृत्यूनंतर मिळाली...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असून, सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे.
sushant was not as famous during his lifetime as he is after his death says majeed memon
sushant was not as famous during his lifetime as he is after his death says majeed memon

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार माजिद मेमन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सुशांतच्या मृत्यूवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी उडी मारली आहे. मेमन यांनी या प्रकरणी ट्विटरवर भूमिका मांडली असून, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माध्यमांमध्ये जेवढी जागा मिळत नाही, तेवढी सुशांतला मिळत आहे, असे म्हटले आहे. सुशांत जिवंत असताना जेवढा प्रसिद्ध नव्हता तेवढा तो मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

गुन्हा जेव्हा तपासाच्या पातळीवर असतो त्यावेळी त्याबद्दल गोपनीयता बाळगावी लागते. गुन्ह्याच्या तपासातील सर्व बाबी जगजाहीर करणे हे पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रिये अडथळे येतात. यामुळे सत्य आणि न्यायाला बाधा पोचते, असेही मेमन यांनी म्हटले आहे. मेमन हे स्वत: जेष्ठ वकील आहेत. 

या ट्विटवरुन गदारोळ उडाल्यानंतर मेमन यांनी पुन्हा ट्विट करुन खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या ट्विटवरुन मोठा गदारोळ झाला आहे. माझ्या म्हणण्याचा विपर्यास करु नये. सुशांतला न्याय मिळू नये असे मी म्हटले नाही. याचबरोबर माझे ट्विट कोणाला कमी लेखण्यासाठी नव्हते. 

रिया चक्रवर्ती हिने पाटण्यातील एफआयआर मुंबईत वर्ग करावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 ऑगस्टला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महाराष्ट्र, बिहार आणि रिया चक्रवर्ती यांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com