पैसे नाहीत म्हणणाऱ्या मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं

देशात कोरोनामुळं आतापर्यंत 3 लाख 85 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Supreme Court orders to give Ex gratia amount to the family of COVID Death
Supreme Court orders to give Ex gratia amount to the family of COVID Death

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यावरून केंद्र सर्वोच्च न्यायालयानं आज मोदी सरकारला फटकारलं. तसेच संबंधितांना भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. पुढील सहा आठवड्यांत याबाबतची नियमावली तयार करण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला. (Supreme Court orders to give Ex gratia amount to the family of COVID Death)

देशात कोरोनामुळं आतापर्यंत 3 लाख 85 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये भरपाई देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. न्यायालयानं यावर केंद्र सरकारला नोटीस पाठवून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर केंद्रानं निधीअभावी चार लाख रुपये भरपाई देणे शक्य नसल्याचं म्हटलं होतं.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार केवळ नैसर्गिक आपत्तीमधील पिडीतांना मदत दिली जात. एका आजारासाठी मदत देणं चुकीचे ठरेल. हे राज्यांच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर आहे, अशी बाजू केंद्रानं मांडली होती. त्यावर न्यायालयाने आज केंद्र सरकारला भरपाई द्यावीच लागेल, असे आदेश दिले. मात्र, ही भरपाई किती असावी, याचा निर्णय सरकारनं घ्यावा. या भरपाईबाबतची नियमावली पुढील सहा आठवड्यांत निश्चित करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

कोविडमुळं मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला भरपाई देणं आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील कलम 12 नुसार आवश्यक आहे. याच कायद्यानुसार कोरोनाला आपत्ती म्हणून घोषित कऱण्यात आलं आहे. आपत्ती प्राधिकरण आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहे. भरपाईबाबत निकष निश्चित करण्याची प्राधिकरणाची जबाबदारी आहे. सरकारनं आपले प्राधान्य निश्चित करायला हवे. आरोग्यव्यवस्था, अन्न आणि निवारा पुरविणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारला अर्थव्यवस्थेची काळजीही घ्यायची आहे, असंही सर्वोच्च न्यायालय म्हणालं. 

काय म्हणालं होतं केंद्र सरकार?

प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला चार लाख रुपये भरपाई दिल्यास SDRF मधील निधी यावरच खर्च होईल. त्यामुळं राज्यांना कोरोनासाठी आवश्यक उपाययोजनांना निधी कमी पडेल. तसेच वादळ, पूर अशा आपत्तींनाही मदत करता येणार नाही. त्यामुळे नातेवाईकांना एवढी भरपाई देणं राज्यांच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर असल्याचं म्हणणं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com