नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशात रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडली असून, ऑक्सिजनअभावी (Oxygen) रुग्णांचे मृत्यू होत आहेत. याची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर शेवटपर्यंत जागे न झालेल्या मोदी सरकारकडून सूत्रे हाती घेतली आहेत. (supreme court forms task force for oxygen shortage in india)
देशात ऑक्सिजनचा पुरेसा आणि वेळेत पुरवठा करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. यावरुन दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेक वेळा फटकारले होते. तसेच, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने देशातील ऑक्सिजन टंचाईचे संकट दूर करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापन केली आहे. यात 12 सदस्य आहेत. ते देशातील ऑक्सिजनची उपलब्धता आणि वितरण यावर नियंत्रण ठेवतील. या दृष्टीने ते परिस्थितीचा आढावा घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना सुचवतील. टास्क फोर्सचे तज्ञ सदस्य सरकारला कोरोना संकट काळातील आव्हानांवर मात करण्यासाठी सल्ला देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
टास्क फोर्सचे सदस्य
1) डॉ.भाबातोश विश्वास (माजी उपकुलगुरु, पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस)
2) डॉ. देवेंदरसिंह राणा (अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, सर गंगाराम हॉस्पिटल, दिल्ली)
3) डॉ. देवी प्रसाद शेट्टी (अध्यक्ष व कार्यकारी संचालक, नारायणा हेल्थकेअर, बंगळूर)
4) डॉ. गगनदीप कांग (प्राध्यापक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लूर)
5) डॉ. जे.व्ही.पीटर (संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लूर)
6) डॉ. नरेश त्रेहान (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मेदांता हॉस्पिटल अँड हार्ट इन्स्टिट्यूट, गुरुग्राम)
7) डॉ. राहुल पंडित (संचालक, क्रिटीकल केअर मेडिसीन अँड आयसीयू, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई)
8) सौमित्र रावत (अध्यक्ष व प्रमुख, सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी अँड लिव्हर ट्रान्सप्लँट, सर गंगाराम हॉस्पिटल, दिल्ली)
9) डॉ. शिवकुमार सरीन (संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्स, दिल्ली)
10) डॉ. झाकिर एफ. उदवादिया, सल्लागार, हिंदुजा हॉस्पिटल)
11) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव
12) टास्क फोर्सचा समन्वयक व केंद्र सरकारचा सचिव
देशात 24 तासांत 4 लाखांहून अधिक नवीन रुग्ण
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 38 हजार 270 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 4 लाख 1 हजार 78 रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 187 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील राज्यनिहाय 24 तासांतील मृत्यू (एकूण मृत्यू 2,38,270)
महाराष्ट्र : 898
कर्नाटक : 592
उत्तर प्रदेश : 372
दिल्ली : 341
छत्तीसगड : 208
तमिळनाडू : 197
पंजाब : 165
राजस्थान : 164
हरियाना : 162
उत्तराखंड : 137
झारखंड : 136
गुजरात : 119
पश्चिम बंगाल : 112
देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे
20 लाख : 7 ऑगस्ट (2020)
30 लाख : 23 ऑगस्ट
40 लाख : 5 सप्टेंबर
50 लाख : 16 सप्टेंबर
60 लाख : 28 सप्टेंबर
70 लाख : 11 ऑक्टोबर
80 लाख : 29 ऑक्टोबर
90 लाख : 20 नोव्हेंबर
1 कोटी : 19 डिसेंबर
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)
2 कोटी : 4 मे
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.