सर्वोच्च न्यायालयात रिया चक्रवर्ती, महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत बिहार सरकारने महाराष्ट्र सरकारच्या असहकार्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
supreme court directs all parties file written reply in sushant singh rajput case
supreme court directs all parties file written reply in sushant singh rajput case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी व सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने पाटण्यातील एफआयआर मुंबईत वर्ग करावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी बिहार आणि महाराष्ट्र सरकारने न्यायालयात भूमिका मांडली. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी बिहार सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मनिंदरसिंह यांनी बाजू मांडली. महाराष्ट्र सरकारच्या असहकार्याचा मुद्दा त्यांनी या वेळी उपस्थित केला. याचबरोबर पाटण्यात या प्रकरणी दाखल झालेला एफआयआर वैध असल्याचा दावाही केला. रिया चक्रवर्ती हिने राजकीय दबावाचा आरोप निराधार असून, कोणताही राजकीय दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

रिया चक्रवर्ती हिच्या वतीने ज्येष्ठ वकील शाम दिवाण यांनी बाजू मांडली. या प्रकरणात बिहार सरकारचा हस्तक्षेप असून, सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरशी रिया चक्रवर्ती हिचा काहीही संबंध नाही, असे दिवाण यांनी सांगितले. बिहार सरकारच्या दबावामुळे यात निष्पक्ष तपास सुरू नाही, असा दावाही त्यांनी केला. मुंबई पोलिसांचा योग्य पद्धतीने तपास सुरू असून, आतापर्यंत त्यांनी 56 जणांचा जबाब नोंदविला आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास बिहारच्या कार्यकक्षेत येत नाही, असे त्यांनी म्हटले. 

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महाराष्ट्र, बिहार आणि रिया चक्रवर्ती यांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com