शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका

एक आठवड्याच्या आत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवरही ताशेरे ओढले होते.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Election) केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला मिळालेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच एक आठवड्याच्या आत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवरही ताशेरे ओढले होते. त्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठीही चपराक असल्याची जोरदार चर्चा आहे. निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्ता काबीज केली आहे. (UP Political News Updates)

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याची 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. आशिषने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. त्याच्या विरोधात आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

Supreme Court
राज ठाकरेंच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर वळसे पाटलांनी भोंग्यांबाबत घेतला मोठा निर्णय

भाजप पुन्हा सत्तेत आला असून, तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्या हल्लेखोरांनी दिल्या जात असल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आली होती. राज्यात भाजपचा पुन्हा विजय झाल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असा दावा भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. याची गंभीर दखल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी घेतली. या प्रकरणी त्यांनी राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचा आदेश दिले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश याचिका कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. राज्य सरकारने हे पाऊल न उचलल्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागत आहे, असे शेतकऱ्यांनी केलेल्या याचिकेत म्हटले होते. त्यावर न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत आशिषचा जामीन रद्द केला. आता त्याला पुढील आठवडाभरात हजर राहण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने जामीनाच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा. पि़डीतांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही, असं निरीक्षणी न्यायालयाने नोंदवले आहे.

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com