
चेन्नई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात मोठी फूट पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारही अल्पमतात आलं आहे. तर दुसरीकडे तमिळनाडूतही पक्षीय राजकारण चांगलंच तापलं आहे. दिवंगत जयललिता यांचा अण्णाद्रमुक हा पक्षही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. (AIADMK Latest Marathi News)
तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) नेतृत्वाच्या मुद्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते व दोन माजी मुख्यमंत्री आमनेसामने उभे ठाकले आहेत. ओ. पनीरसेल्वम आणि एडापडी पलानीस्वामी यांच्यामध्ये नेतृत्वासाठी लढाई सुरू आहे. पक्षाच्या 23 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पलानीस्वामी यांच्या कार्यकर्त्यांनी पनीरसेल्वम यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर 2017 पासून या दोन्ही नेत्यांकडे पक्षाचे नेतृत्व आहे. पण आता केवळ एकच नेता पक्षाचे नेतृत्व करू शकतो, या मागणीने जोर धरला आहे. यातून दोन्ही नेत्यांकडून आपणच जयललिता यांचे खरे वारसदार असल्याचा दावा केला जात आहे.
पक्षाच्या मुखपत्रातून नुकतेच पनीरसेल्वम यांचे नाव व फोटो हटवण्यात आला आहे. सर्वसाधारण सभा झाल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील हा वाद आता टोकाचा बनला असून पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.