तो संत्र्याच्या ज्यूसचा ग्लास गेला कुठे? सुब्रह्मण्यम स्वामींचा सवाल

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन उठलेला गदारोळ अद्याप कायम आहे. या प्रकरणी तीन केंद्रीय यंत्रणा तपास करीत असतानाही सुशांतच्या मृत्यूचे कोडे उगलडलेले नाही.
subramanian swamy questions why sushant singh rajputs orange juice glass was not preserved
subramanian swamy questions why sushant singh rajputs orange juice glass was not preserved

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)  काढला आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. यावर सीबीआयनेच खुलासा करीत तपास संपला नसल्याचे स्पष्ट केले होते. आता भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआयकडून या अहवालाचा अभ्यास सुरू आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

सीबीआयने या प्रकरणी खुलासा केला होता. सीबीआयने म्हटले होते की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. 

आता सुब्रह्मण्यम स्वामी यांना या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यू झाला त्यादिवशी सकाळी त्याने संत्र्यांचा ज्यूस पिला होता. मात्र, हा ज्यूस त्याने पिला तो ग्लास पुढील चाचण्यांसाठी जतन करुन ठेवण्यात आला नाही. अनैसर्गिक मृत्यू प्रकरणांमध्ये घटना घडली ते ठिकाणी सील करावे लागते. मात्र, मुंबई पोलिसांनी सुशांतचे घर सील केले नाही याबद्दल आश्चर्य वाटून घेऊ नये. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. 

यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com