राजीनामा दिला अन् केंद्रीय मंत्री म्हणाले, धूर निघाला म्हणजे आग लागलीय! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार केला जाणार आहे.
State Minister Babul Supriyo resigns from Union Cabinet
State Minister Babul Supriyo resigns from Union Cabinet

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार केला जाणार आहे. सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पण काही कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील खासदार बाबूल सुप्रियो यांचाही समावेश आहे. (State Minister Babul Supriyo resigns from Union Cabinet)

सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्रीपद होते. त्यांनीही आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी फेसबूकवरून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. आपल्याला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते, त्यानुसार मी राजीनामा दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

तसेच फेसबूक पोस्टमध्ये सुप्रियो म्हणतात की, होय, जेव्हा धूर असतो तेव्हा कुठे ना कुठे आग लागलेली असते. मला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते. मला मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभाव मानतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग न लागू देता मी आज जात आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला राजीनामा द्यावा लागला याचं दु:ख आहे पण इतरांसाठी खूप आनंद होत आहे. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत, असं सुप्रियो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

एकूण दहा मंत्र्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा

आज सायंकाळी 6 वाजता मंत्रिमंडळाचा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. कालपासून एकूण दहा मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. 

मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरू असतानाचा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांच्यासह केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. कालपासून एकूण दहा मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

महाराष्ट्रातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे तीन कॅबिनेट मंत्री आहेत. रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे तीन राज्यमंत्री होते परंतु, यातील दानवे आणि धोत्रे यांची गच्छंती झाली आहे. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com