दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आयोगाला अंतिम निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धनुष्यबाणासाठी शिवसेना ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाची याचिका फेटाळण्यात आलेली आहे. दिल्ला हायकोर्टाने यासंबंधी काही आदेश दिलेले आहेत.
पक्ष चिन्हं गोठवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे, असे न्यायालयाने म्हंटले आहे. त्यामुळे आता पुढची लढाई कशापध्दतीने होणार आहे, हे पाहणे महत्वपूर्ण आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुढचे पाऊल काय असेल, हे ही पाहणे महत्वाचे आहे.
आठ ऑक्टोबरला एक निर्णय घेतलेला होता. धनुष्यबाण हे चिन्हं गोठवून ठाकरे आणि शिंदे गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली होती. यानंतर ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाकरे गटाचं म्हणणं होतं की, निवडणूक आयोगाने घाईघाईने निर्णय घेतला, निर्णय घेताना नियमांचे पालन केले गेले नाही. पोटनिवडणूकीसाठी आयोगाने हा निर्णय घेतला होता. आता निवडणूक झाल्याने चिन्हाचा निर्णय पूर्ववत करण्यात यावा, अशी याचिका ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. मात्र आता ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
दरम्यान, आता शिवसेना तातडीने आता या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, या निर्णयाला शिससेना ठाकरे गट आव्हान देणार आहे. यामुळे आता पुढचा सत्तासंघर्ष कशा पद्धतीने होईल, हे पाहणे औत्सुक्याचं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.