विरोधी पक्षाच्या नेत्यानं थेट भाजप मुख्यालयासाठी पाठवलं कुलूप!

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठी गळती लागली आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यानं थेट भाजप मुख्यालयासाठी पाठवलं कुलूप!

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला जोरदार धक्का बसला आहे. ओबीसींचे मातब्बर नेते म्हणून ओळख असलेल्या मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच चार आमदारांनीही राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. भाजपचे डझनभर आमदार पक्ष सोडण्याची शक्यता असल्याने नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. यावर आता समाजवादी पक्षाच्या नेत्याने भाजपच्या मुख्यालयाला लावण्यासाठी कुलूप पाठवले आहे.

भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे नेते मंगळवारी (ता. 11) दिल्लीत दाखल झाले आहे. त्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसह पाच आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चौघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

यावर समाजवादी पक्षाचे नेते आय.पी.सिंह यांनी भाजपच्या मुख्यालयासाठी कुलूप पाठवले आहे. हे कुलूप त्यांनी ऑनलाईन पाठवले असून, ते प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांच्या नावाने पाठवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप मुख्यालयाला लावण्यासाठी मी कुलूप पाठवले आहे. ते भाजपने 10 मार्चनंतर कार्यालयाला लावावे आणि स्वतंत्रदेव सिंह यांनी घरी जावे.

विरोधी पक्षाच्या नेत्यानं थेट भाजप मुख्यालयासाठी पाठवलं कुलूप!
भाजपला खिंडार! चार तासांतच मंत्र्यासह पाच आमदारांची 'एक्झिट'

राजीनामा दिल्यानंतर मौर्य म्हणाले, मंत्री असताना विपरीत स्थिती आणि विचारधारेमध्ये राहून खूप काम केले आहे. मात्र दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरूण आणि छोटे व मध्यम व्यापाऱ्यांकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचे मौर्य यांनी स्पष्ट केलं. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश केला. काही दिवसांत डझनभर आमदार पक्ष सोडणार असल्याचेही त्यांनी सांगितल्याने भाजपला आणखी धक्के बसण्याची चिन्हे आहेत.

विरोधी पक्षाच्या नेत्यानं थेट भाजप मुख्यालयासाठी पाठवलं कुलूप!
गोव्यात भाजपची ताकद वाढली; सांस्कृतिक मंत्र्यांचा अखेर पक्षात प्रवेश

मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता या जातींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com