
दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आर.पी. रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयाने म्हंटले आहे की, तुरुंगातील आरोपींचे चांगली वागणूक या निकषावर सुटकेचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेतील दोषी पेरारिवलनची सुटका करण्याचे आदेशही दिले होते.
आज (ता. 11 नोव्हेंबर) यासंबंधी निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहाही दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले. या दोषींमध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचाही समावेश आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येतील सहा दोषींवर निर्णय सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, तुरुंगात शिक्षा झालेले एस नलिनी, जयकुमार, आरपी रविचंद्रन, रॉबर्ट पियास, सुतेंद्रराजा आणि श्रीहरन यांना चांगल्या वर्तनासाठी तुरुंगातून सोडण्यात आले आहे. तुरुंगातील त्यांचे वर्तन चांगले असल्याचे आढळून आले आणि या सर्वांनी तुरुंगात असताना विविध पदव्या प्राप्त केल्या होत्या.
एका दोषीची सुटका :
न्यायालयाने सांगितले की, तामिळनाडू मंत्रिमंडळाने 9 सप्टेंबर 2018 रोजी दोषींना सोडण्याची शिफारस केली आहे. विशेष म्हणजे 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात राजीव गांधी यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्याच्या तपासात सात जण दोषी आढळले. ज्यामध्ये एक दोषी असलेल्या पेरारिवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु मे महिन्यात पेरारिवलनला सर्वोच्च न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.