आसाम-मिझोराम सीमेवरील संघर्षास अमित शहाच जबाबदार!

आसाम व मिझोराम सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे.
rahul gandhi slams amit shah over assam mizoram border clash
rahul gandhi slams amit shah over assam mizoram border clash

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सकारने दोन्ही राज्यांच्या सीमेवर केंद्रीय सशस्त्र राखीव दलाच्या (CRPF) तुकड्या तैनात केल्या आहेत. आता तेथील परिस्थिती नियंत्रात असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लक्ष्य केले आहे. 

आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या संघर्षात आसाम पोलीस दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षामुळे केंद्र सरकारही कोंडीत सापडले आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या संघर्षात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या संघर्षात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी आशा मी करतो. पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्र्यांमुळे देश अपयशी ठरला आहे. त्यांनी द्वेष आणि अविश्वासाची भावना लोकांच्या मनात रुजवली. याचे धोकादायक परिणाम आता भारत भोगत आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज सकाळी सिलचर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते म्हणाले की, रुग्णालयाला भेट देऊन जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सर्वांना चांगले उपचार मिळावेत, असे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्सने दुसरीकडे उपचारासाठी हलवावे, अशा सूचनाही केल्या आहेत. 

हेही वाचा : सीमेवर तणाव कायम..आसामचे मुख्यमंत्री अन् मिझोरामचे गृहमंत्री देणार भेट 

गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील कोचर, हेलकांडी आणि करीममंग या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com