Rahul Gandhi News : राहुल गांधींची विदेशातील अवैध व्यावसायिकांशी मैत्री ? ; बघा गुलाम नबी आझाद काय म्हणाले..

Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ
sonia gandhi, ghulam nabi azad, rahul gandhi
sonia gandhi, ghulam nabi azad, rahul gandhisarkarnama

Rahul Gandhi Has Links With Undesirable Businessmen : माजी केंद्रीय मंत्री, डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी गांधी परिवारांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.

आझाद यांचे "आझाद" हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या आत्मचरित्रात त्यांनी गांधी परिवाराबाबत अनेक मोठे गोप्यस्फोट केले आहेत. "आझाद"च्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या काँग्रेसवर, विशेषतः राहुल गांधीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

sonia gandhi, ghulam nabi azad, rahul gandhi
Ghulam Nabi Azad : 'आझाद' मधून काँग्रेस नेत्यांची पोलखोल ; जयराम रमेश यांच्यावर गंभीर आरोप.. ; कलम ३७० बाबत..

"परदेशात राहुल गांधी यांचे अनेक अवैध व्यावसायिकांशी मैत्री आहे. ते परदेशात कुठे कुठे जातात, काय करतात, कुठल्या उद्योगपतीना भेटतात, याबाबतचे अनेक उदाहरण मी देऊ शकतो," असे सांगून आझाद यांनी राहुल गांधींच्या अडचणीत वाढ केली आहे.

या आत्मचरित्राच्या माध्यमातून आझाद यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पाच दशके काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या आझादांनी गांधी परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आपला 'डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष'स्थापन केला आहे.

sonia gandhi, ghulam nabi azad, rahul gandhi
Congress मधील सर्वात खराब अध्यक्ष कोण ? ; गुलाम नबी आझादांचा मोठा गौप्यस्फोट

"राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराचे अनेक अवैध व्यावसायिकांशी मैत्रीपूर्ण संबध असून या माध्यमातून ते गैरव्यवहार करीत आहेत. त्यांच्या या गैरव्यवहाराचे माझ्याकडे अनके उदाहरणं आहेत," असे आझाद यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते. माजी खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जयराम रमेश यांच्यावर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत."ससंदेत जेव्हा कलम ३७० वर चर्चा सुरु होती, काँग्रेस त्याला विरोध करीत होती, तेव्हा जयराम रमेश हे सभागृहातून निघून गेले," असा गंभीर आरोप आझाद यांनी केला आहे.

sonia gandhi, ghulam nabi azad, rahul gandhi
Rajasthan Politics News : गेहलोत-पायलट संघर्ष पुन्हा पेटला ; आपल्याच सरकारविरोधात पायलटांनी ठोकला शड्डू

आझाद यांच्या मते पीव्ही नरसिंहराव हे चांगले पंतप्रधानमंत्री जरुर होते, पण १९९६च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला नरसिंहरावच जबाबदार असल्याचा आरोप आझाद यांनी आत्मचरित्रात केला आहे. त्यांनी सांगितले की १९९६ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्यांची चर्चा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत झाली. तेव्हा पक्षाचे नेतृत्व हे पीव्ही नरसिंहराव करीत होते. त्यावेळी आझाद यांनी नरसिंहराव यांच्यासमोरच सांगितले होते की ते चांगले पंतप्रधान आहेत, पण पक्षासाठी ते चांगले अध्यक्ष नाहीत.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com