
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महागाईवरुन मोदी सरकारवर आज जोरदार निशाणा साधला आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई यासह अनेक विषयावरुन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकवेळा नरेंद्र मोदी यांच्यावर (Modi Govt) हल्लाबोल करीत सरकारला धारेवर धरलं आहे.
'घराचा पत्ता लोककल्याण ठेवल्याने कोणाचाही फायदा नाही,' अशा शब्दात राहुल गांधींनी आज मोदींवर निशाणा साधला आहे. ""घराचा पत्ता 'लोक कल्याण मार्ग' ठेवल्याने जनतेला फायदा होत नाही.पंतप्रधानांनी साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी 'महागाई, कमाई' वाढवली आहे.रिड्यूस मॉडेल लागू केले आहे," असे टि्वट राहुल गांधींनी केलं आहे. 'वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे,' असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
जम्मू-काश्मीरबाबत केंद्रातील मोदी सरकारला राहुल गांधी यांनी यापूर्वी घेरले होते. जम्मू-काश्मीरमध्ये बँक मॅनेजर, शिक्षक आणि अनेक निरपराध लोकांचा दररोज बळी जात आहे, काश्मिरी पंडित स्थलांतर करत आहेत, असे ट्विट राहुल गांधी नुकतेच केलं होते.
"ज्यांना त्यांचे संरक्षण करायचे आहे, त्यांच्याकडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ नाही. भाजपने काश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवले आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावे," अशी मागणी राहुल गांधी यांनी केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.