Charanjit Singh Channi
Charanjit Singh Channi

पंजाब पुन्हा तापलं; मुख्यमंत्री चन्नींनी घेतली थेट कॅप्टनच्या घरी धाव

पंजाबमध्ये पुन्हा एका राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेस (Congress) नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) कारणीभूत ठरले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. यावरून काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना लक्ष्य केलं आहे. यामुळे नाराज झालेले चन्नी हे थेट माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या घरी पोचले आहेत. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. यामध्ये पंजाबचाही समावेश आहे. यापूर्वी पंजाबमध्ये केवळ 15 किलोमीटरपर्यंत बीएसएफला अधिकार होते. आता हे क्षेत्र 35 किलोमीटरने वाढल्याने त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. यावरून काँग्रेसमधील वादही उघड झाले आहेत. काँग्रेस विरूध्द काँग्रेस अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

हा वाद सुरू झाल्यानंतर चन्नी हे थेट कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या घरी पोचले आहेत. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्यास चन्नी यांचा विरोध आहे. परंतु, कॅप्टन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे असतानाही चन्नी हे कॅप्टन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू असून, या चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Charanjit Singh Channi
रावणाचे दहन 2024 मध्ये पूर्ण होणार! संजय राऊतांची भविष्यवाणी

पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील वाद पुढे आले आहेत. त्यातच आता हा निर्णय आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर आठवडाभरातच हा निर्णय झाल्याने जाखड यांनी चन्नी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Charanjit Singh Channi
मोठी बातमी : देशातील कोळसा टंचाईची खुद्द केंद्रीय कोळसा मंत्र्यांनीच दिली कबुली

कशावरून सुरू झाला वाद?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत सीमा सुरक्षा, जम्मू व काश्मीर आदी मुद्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा निर्णयही महत्वाचा मानला जात आहे. बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. या भागात तपास करणे, संशयितांना अटक करणे, जप्ती करणे असे अधिकार मिळाले आहे. पंजाब, पश्चिम बंगाल व आसाममध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र केवळ 15 किलोमीटरहोते. आता सुधारित आदेशानुसार हे क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बीएसएफला तपासणी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com