अर्णब गोस्वामीला स्वत:चीच लाज वाटायला हवी; पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचे कुटुंबीय संतापले

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे.
pulwama attack martyr families slams arnab goswami and central government
pulwama attack martyr families slams arnab goswami and central government

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे. गोस्वामींना पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यांचा वापर टीआरपी वाढवण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. यावरुन पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. बालाकोटमधील हल्ल्याची अर्णब गोस्वामींना पूर्वकल्पना होती. याचबरोबर पुलवामा हल्ला झाल्यानंतर त्याने आनंदही व्यक्त केला होता, या गोष्टी समोर आल्या आहेत. यावर पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे कुटुंबीय संतापले आहेत. त्यांनी या प्रकरणी अर्णबसह केंद्र सरकारलाही धारेवर धरले आहे. अनेक निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनीही या संपूर्ण प्रकरणावर कोरडे ओढले आहेत. 

गोस्वामी याला लाज वाटायला हवी. त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली असून, त्याच्यावर कडक कारवाई करायला हवी. आमच्या कुटुंबातील सदस्य पुलवामात हुतात्मा झाल्यानंतर आमच्यासह संपूर्ण देश दु:खात असताना तू टीआरपी रेटिंग वाढण्याची चर्चा करीत होतास. तुला स्वत:ची लाज वाटायला हवी. आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. तुम्ही केवळ टीव्हीवर मोठ्या गप्पा मारता आणि प्रत्यक्षात वेगळेच वागता, अशी भावना पुलवामातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com