महाराष्ट्रात मोफत रेल्वे तिकिटे वाटून काँग्रेसने कोरोना वाढवला : मोदींचा घणाघात

लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : कोरोना हे जागतीक संकट होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण केले गेले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने हद्दच केली. महाराष्ट्र सरकारवरील कोरोनाचा (Corona) ताण कमी करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसने (Congress) मोफेत तिकिट वाटले. त्यामुळे इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केला. यावर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण देताना मोदी यांनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात लॅाकडाऊन होता. जागतीक आरोग्य संघटना आणि इतर देश लॅाकडाऊनचे समर्थन करत होते. जे लोक जिथे आहेत. त्यांनी तिथेच राहावे, असे सांगत असताना मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश, बिहारमधील नागरिकांना परत जाण्यासाठी मोफत तिकिट वाटले. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. हे काम करुन काँग्रेसने आपल्यावरील जबाबदारी झटकली.

Narendra Modi
`पुढची शंभर वर्षे काॅंग्रेस सत्तेवर येणार नाही, असे त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसतयं`

त्याच बरोबर दिल्ली सरकारनेही नागरिकांना आपल्या गावी परत जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होते. मुंबई आणि दिल्लीतून गेलेल्या नागरिकांमुळे या राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढले. हे पाप काँग्रेसने केले, असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, त्यावर पंतप्रधान म्हणाले मी कोणाचे नाव घेतले नाही. कोणतीही टोपी घालण्याची गरज नाही. तुम्ही उभे राहिले त्यामुळे मी नाव घेऊन बोलतो. कोरोना काळात काँग्रेसने हद्दच केली. त्यामुळे सभागृहात काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर मोदी म्हणाले काँग्रेसचे हे राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. काँग्रसेच्या या विचारामुळे संपूर्ण देश आश्चर्य चकीत झाला आहे.

अनेकांना वाटत होते की कोरोनाच्या विरोधात भारत लढु शकनार नाही. मात्र, जगातील सर्वात मोठे प्रभावी लसीकरण (Corona Vaccination) भारतात झाले. आज सगळ्या नागरिकांना पहिला डोस आणि ८० टक्के लोकांना दुसरा डोस दिला गेला आहे. हा देश तुमचा नाही का, देशातील लोक तुमचे नाहीत का, असा सवाल पंतप्रधानांनी केला. किती राजकीय पक्षांच्या लोकांनी जनतेला सांगितले की हात धुवा, मास्क घाला. हे केले असते तर नरेंद्र मोदी यांना काय फायदा झाला असता. काही लोकांना वाटत होते की कोरोना मोदी सरकारला बदनाम करेल. या अभियानाला ताकद दिली असती तर काय झाले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

Narendra Modi
गृहमंत्री शहांनी केली ओवेसींना विनंती; म्हणाले आमच्या चिंतेचे समाधान करा..

इतक्या वर्षापासून कोणीच तुम्हाला मतदान करत नाही आहे. मला कधी कधी विचार येतो, वाटते की १०० वर्ष सत्तेमध्ये यायचे नाही, असे मन काँग्रसने बनवले आहे, असा चिमटा मोदी यांनी काढला. कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी सगळे काही केले आहे. सगळ्या जगात भारताचे नाव बदनाम करण्यासाठी काही जाणांनी काम केले. मात्र, तरी सुद्धा कोरोना काळात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान्याचे उत्पादन केले, असेही मोदी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com