'रावणा'च्या निधनाचं नरेंद्र मोदींना दु:ख पण...

रामायण मालिकेत रावणाचे पात्र साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
Arvind Trivedi and Narendra Modi
Arvind Trivedi and Narendra Modi

लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश होता. मिश्रा यांचा मुलगा आशिष यातील एक गाडी चालवत होता, असा दावा करण्यात आला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण केले आहे.

यातच जगातील सर्व घडामोडींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूर खीरीतील घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एवढा मोठा हिंसाचार होऊनही मोदींनी एकही ट्विट केलेले नाही. याचवेळी रामायण मालिकेत रावणाचे पात्र करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल मात्र, मोदींनी शोक व्यक्त केला आहे. यामुळे मोदींना सोशल मीडियावर अनेक नेटिझन्स प्रश्न विचारू लागले आहेत.

लखीमपूर खीरीत चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दलही दोन शब्द बोला, अशी मागणी अनेक नेटिझन्सनी मोदींकडे केली आहे. दरम्यान, मोदी हे काल लखनौमध्ये गेले होते. तेथून केवळ 3 तासांच्या अंतरावर लखीमपूर खीरी आहे. परंतु, मोदींनी लखीमपूर खीरीला भेट तर दिली नाही. याचबरोबर या कार्यक्रमात एकदाही लखीमपूर खीरीतील घटना आणि मृत शेतकऱ्यांबद्दल साधा उल्लेखही मोदींनी केला नाही.

लखीमपूर खीरीतील घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. तरीही भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे भाजप नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप प्रवक्त्यांपासून बडे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Arvind Trivedi and Narendra Modi
'आप'च्या धक्क्याने भाजपचा विजय अन् काँग्रेसचा पराभव

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाल असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

Arvind Trivedi and Narendra Modi
केंद्रीय मंत्र्यांची विकेट? अमित शहांच्या दरबारी तातडीने हजेरी

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com