कमी पडल्याची कबुली देत पंतप्रधान मोदींनी मागितली देशाची माफी

बहुतेक आमची तपस्या कमी पडली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी सकाळी तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ही घोषणा करताना पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडल्याची कबुली देत देशवासियांची माफी मागितली. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे (Agriculture Acts) मागे घेण्याची मोठी घोषणा केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. या उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळाली, उत्पादनाची योग्य किंमत, पर्याय मिळावेत. अनेक वर्षांपासून ही मागणी होती. आधीही अऩेक सरकारांनी यावर मंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

PM Narendra Modi
मोदी सरकार सात वर्षात पहिल्यांदाच झुकलं!

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशातील कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गरीबांच्या उज्वल भविष्यासाठी सत्यनिष्ठेने, शेतकऱ्यांप्रति पूर्ण समर्पणभावनेतून प्रामाणिकपणे हे कायदे सरकारने आणले होते. पण एवढी पवित्र गोष्ट, पूर्णरुपाने शुध्द, शेतकऱ्यांच्या हिताची बाब आम्ही आमच्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. शेतकऱ्यांचा एकच वर्ग याला विरोध करत होता. पण तरीही हे आमच्यासाठी महत्वाचे होते. कृषी अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, प्रगतीशील शेतकऱ्यांनीही कृषी कायदेचे महत्व समजावून सांगण्याचे खूप प्रयत्नही केले.

आम्ही विनम्रपणे, खुल्या मनाने त्यांना समजावत होतो. अनेक माध्यमातून व्यक्तिगत, सामूहिक चर्चा होत होती. शेतकऱ्यांचे तर्क समजवून घेण्यात काहीच कसर सोडली नाही. त्यांची हरकत असलेल्या तरतुदी बदलण्यासाठीही सरकार तयार झाली होती. दोन वर्षांपर्यंत हे कायदे स्थगित करण्याचाही प्रस्ताव दिला. याचदरम्यान हा विषय सर्वोच्च न्यायालयातही गेला. या सर्व गोष्टी देशासमोर आहेत. त्यामुळे यात अधिक विस्तारात जाणार नाही.

मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असले. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तीनही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ, असे आवाहनही मोदींनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com