केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक होणार; सर्वोच्च न्यायालयानं मागवली घटनेची माहिती

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Union Minister Ajay Mishra
Union Minister Ajay Mishra

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने हे कृत्य केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे. आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. मागील चार दिवसांपासून त्याच्या अटकेची मागणी होत आहे. यावर बोलताना उत्तर प्रदेशाच्या पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंग यांनी आशिषचा शोध सुरू असल्याचे सांगितेल. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, आशिष मिश्रा याला पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

Union Minister Ajay Mishra
दहशतवाद्यांचा धुमाकूळ; श्रीनगरमध्ये दोन शिक्षकांची हत्या...पाच दिवसांत सात मृत्यू

दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रावरून न्यायालयात गुरूवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. या पत्राच्या आधारे न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली आहे. यावर न्यायालयानं उत्तर प्रदेश पोलिसांकडे कारवाई माहिती मागवली आहे. घटनेप्रकरणी कुणावर गुन्हे दाखल केले, कुणाला अटक केली आदी माहिती मागवण्यात आली आहे. तर निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची स्वतंत्र चौकशी केली जात असल्याची माहिती सरकारकडून न्यायालयात देण्यात आली. शुक्रवारी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या घटनेच्या चौकशीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी अजय मिश्रा यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. ते पदावर असताना योग्यप्रकारे चौकशी होऊ शकणार नाही, असा आरोप केला जात आहे. भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही ट्वीट अजय मिश्रा यांना अडचणीत आणले आहे. आपल्या ट्वीटर वरुण गांधी यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

लखीमपूर खिरीमध्ये जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडण्याचा हा व्हिडिओ कोणालाही हादरवून टाकेल. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या वाहनांचे मालक, त्यांमध्ये बसलेले लोक आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com