एअर इंडियाची मालकी टाटांकडे जाताच पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन; म्हणाले...

विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार करत खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra Modi

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर इंडिया (Air India) या एकमेव सरकारी विमान कंपनीचे खासगीकरण केलं आहे. टाटा समूहाला (Tata Group) नुकतीच ही कंपनी विकण्यात आली. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार करत खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील काही वर्षांपासून खासगीकरणावरून विरोधकांनी धारेवर धरले होते. अखेर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या प्रश्नांवर आपले मौन सौडले.

इंडियन स्पेस असोसिएशन (ISA) या संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या सुधारणाविषयक धोरणांवर जोर देत खासगीकरणाचे समर्थन केले. ते म्हणाले, यापूर्वी देशाने एवढे निर्णायक सरकार पाहिलेले नाही. एअर इंडियाचे खासगीकरण हे सरकारचे यश असून यावरून सरकारची कटिबध्दता आणि गांभीर्य दिसून येते.

PM Narendra Modi
अखेर केंद्रीय मंत्र्यांनी विरोधी पक्षातील भावाला फोडत भाजपमध्ये आणलंच!

सार्वजनिक क्षेत्राविषयी सरकारचं स्वतंत्र धोरण असल्याचं सांगत पंतप्रधान म्हणाले, ज्या क्षेत्रांमध्ये कंपनीची आवश्यकता नाही. हे सरकारी उपक्रम खासगी उपक्रमांसाठी खुले करायला हवेत. सरकारने राष्ट्रीय हित विचारात घेऊन निर्णय घेतले आहेत. आत्मनिर्भर भारत बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट स्पष्ट असल्यानेच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहेत, असंही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.

टाटा सन्समधील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने 18 हजार कोटी रुपयांना एअर इंडियाची खरेदी केली आहे. हा व्यवहार डिसेंबर अखेरपर्यंत पुर्णत्वास जाईल, असेही पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. एअर इंडिया कंपनीचा तोटा वाढत चालल्याने सरकारने कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

PM Narendra Modi
भाजपला मोठा झटका; कॅबिनेट मंत्र्याचा आमदार मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान, एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांनी वित्तीय बोली लावलीे होती. केंद्र सरकारने एअरलाईन्समधील आपली 100 टक्के हिस्सेदारी विकली आहे. यामध्ये एअऱ इंडियातील 100 टक्के हिस्सा असलेली एआई एक्सप्रेस लि. आणि 50 टक्के हिस्सा असलेली एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

टाटा कंपनीची बोली अधिक ठरल्याने एअर इंडिया 68 वर्षांनी पून्हा टाटांकडे आली आहे. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाईन्सच्या नावाने एअर इंडियाची स्थापना केली होती. सरकारने 1953 मध्ये एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर 68 वर्षांनी टाटांनी पुन्हा एअर इंडियाला समूहात आणले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com