Amar Jawan Jyoti : वाद सुरू असतानाच पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युध्द स्मारकातील ज्योतीमध्ये विलीन केली जाणार आहे.
Statue of Netaji Subhash Chandra Bose
Statue of Netaji Subhash Chandra Bose Sarkarnama

नवी दिल्ली : इंडिया गेटवर (India Gate) मागील पन्नास वर्षांहून अधिक काळापासून प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योती' (Amar Jawan Jyoti) आज विझणार आहे. ही ज्योती आता राष्ट्रीय युध्द स्मारक (National War Memorial) येथे प्रज्वलित केली जाणार आहे. त्यावरून काँग्रेससह अनेकांनी जोरदार टीका केली आहे. हा निर्णयावरून वाद सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठी घोषणा केली आहे.

अमर जवान ज्योतीला शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय युध्द स्मारकावरील प्रज्वलित ज्योतीमध्ये विलीन केले जाणार आहे. त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. केंद्र सरकारकडून शहीद जवानांचा अपमान करण्यात आल्याची टीका काँग्रेसने (Congress) केली आहे. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधीही यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Statue of Netaji Subhash Chandra Bose
अखंडपणे 50 वर्षे प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योत' आज विझणार; मोदी सरकारचा निर्णय

हा वाद सुरू असतानाच पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून मोठी घोषणा केली आहे. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 'संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे. यावेळी मला हे सांताना आनंदो होतोय की, नेताजींची ग्रेनाईटचा भव्य पुतळा इंडिया गेटवर उभारला जाणार आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारताच्या कृतज्ञतेचे प्रतिक असेल,' असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

नेताजींचा भव्य पुतळा तयार होईपर्यंत त्यांचा होलोग्रामचा पुतळा तिथे लावला जाईल. मी 23 जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीनिमित्त होलोग्रामच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली आहे. नेताजींचा 28 फूट उंच आणि सहा फूट रुंदीचा भव्य पुतळा तयार केला जाणार असल्याचे समजते. इंडिया गेटसमोरील मेघडंबरीमध्ये हा पुतळा स्थापित केला जाणार आहे. याबाबचे छायाचित्रही पंतप्रधानांनी ट्विट केलं आहे.

इंडिया गेटसमोरील मेघडंबरीमध्ये 1968 पासून काहीही नाही. त्याआधी त्याठिकाणी जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. हा पुतळा काँग्रेस सरकारच्या काळात हटवून कोरोनेशन पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात आला. तेव्हापासून ही मेघडंबरी रिकामी आहे. आता तिथेच नेताजींचा पुतळा उभारला जाणार आहे. इंडिया गेट आणि राष्ट्रीय युध्द स्मारकादरम्यान ही मेघडंबरी आहे.

अमर जवान ज्योत आता युध्द स्मारकात

राष्ट्रीय युध्द स्मारक येथेही ज्योत आहे. आता दोन वेगळ्या ठिकाणांऐवजी केवळ युध्द स्मारकातच ज्योत अखंडपणे प्रज्वलित ठेवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय युध्द स्मारकाचे लोकार्पण केले आहे. या स्मारकात विविध युध्दांमध्ये शहीद झालेल्या 25 हजार 942 जवानंची नावे कोरण्यात आली आहे. हे स्मारक 40 एकर जमीनीवर विखरलेले असून त्यासाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

पहिल्या महायुध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ ब्रिटिश सरकारने इंडिया गेटची उभारणी केली होती. त्यानंतर 1972 मध्ये 1971 च्या पाकिस्तान (Pakistan) युध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ तिथे अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात आली. या युध्दात भारताचा विजय झाला आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 26 जानेवारी 1972 रोजी या ज्योतीचे लोकार्पण केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com