कंगनावरुन पुन्हा एकदा उत्तर भारत विरुद्ध महाराष्ट्र वादाची ठिणगी

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आता तापले आहे. तिच्या समर्थनार्थ उत्तर भारतातील नेते आता मैदानात उतरू लागले आहेत.
north indian leaders are now supporting actress kangana ranaut
north indian leaders are now supporting actress kangana ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेने आज पाडून टाकले. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या कंगनाने पुन्हा मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली आहे. यावरुन आता पुन्हा मोठा गदारोळ सुरू झाला आहे. आता या वादात उत्तर भारतीय नेते उडी घेऊ लागले आहेत. अनेक नेते कंगनाला पाठिंबा देऊ लागले आहेत. यामुळे पुन्हा एकदा उत्तर भारत विरुद्ध महाराष्ट्र हा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते. यावर शिवसेनेने कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगनाने मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी केली. तिने कालच कोरोना चाचणी केली. मुंबईत गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे लागू नये म्हणून तिने ही शक्कल लढविली होती. 

कंगनासोबत तिची बहीण रंगोली चंडेल आणि आणखी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. कंगना आज सकाळी वाय सुरक्षेसह चंडीगडमधील चंडीगड विमानतळावर आली. तेथून विमानाने ती मुंबईकडे रवाना झाली होती. ती मुंबई विमानतळावर दाखल झाली. कंगनाचे विमानतळावर दाखल झाल्यानंतर सीआरपीएफच्या पथकाने तिला त्यांच्या वाहनात बसवले. तेथून तिला घेऊन तातडीने पथक बाहेर पडले. 

कंगनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळावर जमले आहेत. शिवसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती.विमानतळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. यात करनी सेनाही कंगनाच्या बाजूने मैदानात उतरली होती. 

लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान हे कंगनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. सर्व बिहारी जनता आणि उत्तर भारतातील नागरिकांनी कंगनाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सगळे देशभक्त कंगनाच्या पाठीशी आहे. बिहारी तरुणाची लढाई लढत असतानाच कंगनाने बॉलीवूडमधील सत्यही समोर आणले आहे. यामुळे तिच्या विरोधात अनेक लोक गेले आहेत. मुंबईतील बिहारी आणि उत्तर भारतीय नागरिकांना आवाहन करतो की, कंगना ही देशाची मुलगी आहे. ती आज मुंबईत पोचली असून, तिला सर्वांना साथ द्यावी. 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे मैदानात उतरले आहेत. कंगनाच्या बंगल्यावर केलेली कारवाई निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिमाचलची ती मुलगी असून, तिला तिच्या क्षेत्रात काम करण्यासाठी योग्य वातावरण मिळायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्विटरवर कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंगनाला सांगा विश्वास कायम ठेव. आम्ही या लढ्यात तिच्यासोबत आहोत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com