नितीशकुमारांचे मुख्यमंत्रीपदी पुनरागमन : २४ तासांत थाटला तेजस्वी यादवांसोबत संसार

Nitish Kumar | tejashwi Yadav| JD(U) | RJD काल राजीनामा आज पुन्हा शपथ....
Nitish Kumar | tejashwi Yadav
Nitish Kumar | tejashwi YadavSarkarnama

(Nitish Kumar | Tejashwi Yadav| JD(U) | RJD)

पाटणा : अवघ्या २४ तासांत नितीशकुमार (Nitish Kumar) यांचे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुनरागमन झाले आहे. त्यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे बिहारमध्ये आता जनता दल (संयुक्त)-भाजप सरकारच्या जागी जनता दल (संयुक्त)-राजद-काँग्रेस या पक्षांचे महागठबंधन सरकार सत्तेवर आले आहे. काल (मंगळवारी) नितीशकुमारांनी जनता दल (संयुक्त)-भाजपच्या सरकारमधील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून एनडीएसोबत काडीमोड घेतला होता. त्यानंतर लगेच राष्ट्रीय जनता दलासोबत युतीची घोषणा करण्यात आली होती. (Nitish Kumar | Tejashwi Yadav| JD(U) | RJD)

नितीशकुमार यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबरोबर न पटल्याने त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून जेडीयू आणि भाजपमधील तणाव शिगेला पोहोचला होता. केंद्रीय मंत्री अमित शहा हे सतत जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, असे नितीश कुमार यांचे म्हणणे होते. पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला होता.

Nitish Kumar | tejashwi Yadav
BJP मित्रपक्षांना संपवतो... नितीशकुमारांचे पाऊल योग्यच : शरद पवार

जेडीयूच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आरसीपी शिंह यांनी गेल्या आठवड्यात पक्षाचा राजीनामा दिला होता. 2017 मध्ये, आरपीसी सिंह हे नितीशकुमार यांचे प्रतिनिधी म्हणून जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले होते. मात्र, त्यानंतर नितीशकुमार यांनी सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सिंह यांच्या माध्यमातून भाजप पक्ष फोडू शकते असा संशय नितीशकुमार यांना होता.

Nitish Kumar | tejashwi Yadav
Sharad Pawar|धनुष्यबाण शिवसेनेचा: शिंदे गटाने वाद वाढवू नये

त्यामुळेच महाराष्ट्रात जी अवस्था शिवसेनेची झाली ती आपली होऊ नये या भावनेतूनच त्यांनी भाजपचा हात सोडल्याचे सांगितले जात आहे. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जेडीयूने 243 जागांपैकी 45 जागा जिंकल्या. तर भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवून त्यांच्याकडे राज्याची कमान सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 मध्ये राष्ट्रीय जनता दलाने 79 जागा आणि काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com