गावकऱ्यांच्या हत्येचा बदला घेणार; नागा आर्मीने लष्कराला दिला निर्वाणीचा इशारा

लष्करी जवानांच्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Nagaland
NagalandSarkarnama

नवी दिल्ली : नागालँडमध्ये (Nagaland) लष्कराने (Army) केलेल्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावरून या राज्यात वादळ उठलं असून सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यारून आता बंडखोर संघटना असलेल्या गव्हर्नमेंट ऑफ द पिपल्स रिपब्लिक ऑफ नागालँड (GPRN) च्या नागा आर्मीने (Naga Army) निर्वाणीचा इशारा दिला आहे. नागा नागरिकांच्या हत्येचा बदला घेणआर असल्याचे सांगत नागा आर्मीने जणू लष्कराविरुध्द आता युध्द पुकारले असल्याचे सांगितले जात आहे.

नागालँडमधील मोन जिल्ह्यात ता. 4 डिसेंबर रोजी 13 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. लष्कराच्या जवानांनी बेछूट केलेल्या गोळीबारात या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारामध्ये एक जवानही शहीद झाला आहे. त्यानंतर नागालँडसह ईशान्येकडील राज्यांमध्ये तणावाची स्थिती आहे. राज्यात सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी लवकरच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Nagaland
रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

नागा आर्मीने या घटनेचा निषेध केला आहे. याबाबत प्रसिध्दीत दिलेल्या निवेदनात त्यांना नागरिकांनाही आवाहन केले आहे. राज्यात शांततामय वातावरणासाठी आम्ही भारतीय लष्कराविरोधातील अनेक ऑपरेशन थांबवली आहेत. पण लोकांना लष्कराकडून कायम मिळाले? काहीच नाही. केवळ अत्याचार, बलात्कार, हत्या अशा घटना वेळोवेळी घडल्या आहेत.

त्यामुळे आता निरापराध लोकांच्या हत्येचा बदला लवकरच किंवा काही काळाने नागा आर्मीकडून घेतला जाईल. आम्ही याची सुरूवात केल्यानंतर लोकं आम्हाला समजून घेतली, अशी अपेक्षा आहे, असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. नागा आर्मीच्या या पवित्र्यामुळे राज्यात आता आणखी संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील वातावरण तणावग्रस्त असून त्यातच नागा आर्मीने हे निवदेन जारी केल्याने तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, चार डिसेंबर रोजी लष्कराने बंडखोरांविरोधात एक ऑपरेशन राबविले जात होते. यादरम्यान, एका पिकअपमध्ये काही नागरिक जात होते. त्यांना थांबण्यास सांगून थांबले नाहीत. त्यामुळे जवानांनी गोळीबार केला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या नागरिकांची ओळख न पटवताच गोळीबार गेल्याचे शहा यांनी सांगितले.

या नागरिकांचे मृतदेह पाहिल्यानंतर गावातील नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली. यातून लष्करी वाहनांवर गावकऱ्यांनी हल्ला चढवला. त्यानंतर जवानांनी स्वत:च्या बचावासाठी केलेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला. यात एक जवानही शहीद झाल्याची माहिती शहा यांनी दिली. तसेच या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाणार असून एक महिन्यात त्याच अहवाल येणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com