राज ठाकरेंना शह देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात ; राऊतांकडून मोठी घोषणा

गेल्या अनेक वर्षांपासून आमचा आणि त्यांचा परिचय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या भेटीत असं ठरवलं होतं.
Aditya Thackeray, Raj Thackeray
Aditya Thackeray, Raj Thackeraysarkarnama

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्या (Ayodhya)दैारा जाहीर केला आहे. अयोध्येला कधी जाणार याची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. त्यापूर्वी नाशिक येथे आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांचा अयोध्या दैारा जाहीर केला आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. हिंदुत्व, राम मंदिर आणि अयोध्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची नजर असणार आहे.

हिंदुत्वाचा मुद्यावर मनसेचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राज ठाकरेंचा हा अयोध्या दैारा असल्याचे बोललं जाते. तर हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सरसावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दैाऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या या दैाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याचे राऊतांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Aditya Thackeray, Raj Thackeray
'हिमालयात जाईन' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज ; मी अजून लढलोच नाही..

संजय राऊत म्हणाले, ''मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्याची जाण्याची शक्यता आहे. अयोध्या आमचं घर आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही. अयोध्या आमचं स्वागत करते,''

''बाबरी मशीदीचे ढाचे पाडण्यापासून ते राम मंदिराचा कळस उभारण्यापर्यंत मधल्या काळात अनेकदा आमचं जाणं येणं आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही. अयोध्या आमचं स्वागत करते. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तिथले पुजारी रहिवासी आमच्या स्वागतासाठी येतात,'' असे राऊत म्हणाले.

''गेल्या अनेक वर्षांपासून आमचा आणि त्यांचा परिचय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या भेटीत असं ठरवलं होतं की, महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी तिथे निवासाची सोय करता यावी,'' असे राऊतांनी स्पष्ट केलं.

Aditya Thackeray, Raj Thackeray
ईडीवादाचा हा पराभव ; भाजप नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेनं नाकारलं!

''काही लोक हनुमान चालीसा म्हणण्यासाठी पुण्याला गेले, काहींनी भाड्याने हिंदुत्व घेतले, कोल्हापूर पोट निवडणूकमध्ये जनतेने त्यांचे भोंगे खाली उतरविले, भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, कोल्हापूरकरांनी विरोधकांचे भोंगे खाली उतरवलेत, हिजाब वादानंतर आता हनुमानावरून राजकारण सुरू आहे. भाड्यानं हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये,'' अशा शब्दात राऊतांनी विरोधकांना सुनावले.

राऊत म्हणाले, "एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे. त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोकं असं स्वीकारत नाहीत. या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com