आभाळ फाटलं! केरळमध्ये पाच जिल्ह्यांत रेड अलर्ट; मदतीसाठी हवाई दल, लष्कर उतरलं

केरळच्या राज्यावर आभाळ फाटलं आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Kerala Flood
Kerala Flood

तिरुअनंतपुरम : केरळच्या (Kerala) राज्यावर आभाळ फाटलं आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पाच जिल्ह्यांत रेड अलर्ट (Red Alert) जाहीर केला आहे. पथानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांत येत्या काही दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय सात जिल्हयात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. राज्य सरकारने मदतीची विनंती केल्यानंतर लष्कर आणि हवाई दल दाखल झाले आहे.

केरळच्या अनेक जिल्हयात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते जलमय असून बारा जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. पथानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या पाच जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी वाहने पाण्याखाली गेली आहेत. राज्य सरकारने विनंती केल्यानंतर हवाई दल आणि लष्कराने मदतकार्य सुरू केले आहे. हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाच्या सर्व तळांवर हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये लष्कराने जवान तैनात केले आहेत.

हवामान विभागाने केरळच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर अरबी समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाल्याले म्हटले आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी १७ ऑक्टोबरपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर १८ ऑक्टोबरला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच १९ ऑक्टोबरला सकाळी पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Kerala Flood
डॉ.मनमोहनसिंगांना डेंगीची लागण; प्रकृतीबाबत 'एम्स'कडून माहिती जाहीर

हवामान विभागाने पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. याचा अर्थ त्याठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यात तिरुअनंतपुरम, अलेप्पी, कोल्लम, कोझिकोड, वायनाड, मलप्पुरम, पलक्कडचा समावेश आहे. राज्यातील दक्षिण भागातील दोन जिल्ह्यांत विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे.

Kerala Flood
खासदारानं व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना रावण असं म्हणून दिला शाप!

हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, डोंगराळ भागात आणि नदी किनाऱ्यावर प्रवास करण्याचे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com