शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी शक्ती...मुख्यमंत्री खट्टर यांचा धक्कादायक दावा

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीत दाखल होत आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर सुरू आहे.
manoharlal khattar says some unwanted elements in farmers protest crowd
manoharlal khattar says some unwanted elements in farmers protest crowd

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. देशभरातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आंदोलनासाठी दिल्लीत पोचत आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर होत आहे. या प्रकरणी टीकेचे धनी बनलेले हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी धक्कादायक दावा करुन खळबळ उडवून दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजपशासित हरियानात शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुरारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर अद्याप अडकून पडले आहेत. 

शेतकरी आंदोलकांमध्ये समाजविघातक शक्ती घुसल्या आहेत, असा दावा हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे. ते म्हणाले की, आमच्यापर्यंत अशी माहिती पोचली आहे की, या आंदोलनाच्या गर्दीत काही समाजविघातक शक्ती घुसल्या आहेत. ते काही घोषणा देत आहेत. याचे व्हिडीओही समोर आले आहेत. इंदिरा गांधींना सोडले नाही तर मोदींना कसे सोडू, अशा घोषणा देण्यात येत आहेत. 

पोलिसांनी शेतकऱ्यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा फोटो काँग्रेस नेते राहुल गांधींनी शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी पोलिसांकडून एका वृद्ध शेतकऱ्याला सुरू असलेल्या मारहाणीचा फोटोही शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा अतिशय दु:खद फोटो आहे. आपला नारा तर जय जवान जय किसान होता. परंतु, आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवानांनाच किसानांच्या विरोधात उभे केले आहे. हे अतिशय धोकादायक आहे. 

भारतीय किसान युनियनेही केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. युनियनच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीत आंदोलनासाठी जात आहेत. युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com