कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार!

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. देशात रविवारी 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले असून, 1 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
mamata banerjee says prime minister narendra modi is responsible for covid second wave
mamata banerjee says prime minister narendra modi is responsible for covid second wave

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.  देशात काल (ता.18) 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले असून, 1 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. याला आठ टप्प्यात होत असलेली विधानसभा निवडणूक कारणीभूत आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी आधी केली होती. बंगालमध्ये रविवारी 8 हजार  419 कोरोना रुग्ण सापडले. 

या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांना देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मागील सहा महिन्यांत पंतप्रधानांनी कोरोना रोखण्यासाठी काय पावले उचलली? तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस पंतप्रधानच जबाबदार आहेत. त्यांनी योग्य वेळी जबाबदारी घेतली असती तर ही वेळ देशावर आली नसती. 

विधानसभा निवडणुकीमुळे प्रचारसभा आणि रॅली यांचे आयोजन केले जात आहे. यासाठी प्रचंड गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना विषयक इतर उपाययोजनांचे पालन होत नाही. याचाच परिणाम होऊन राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बंगालमध्ये अद्याप निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. उरलेले टप्पे एकाच दिवशी घ्यावेत, अशी मागणीही तृणमूलने केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने यात बदल करण्यास नकार दिला आहे. 

अखेर ममतांनीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रचार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकत्यात तर त्यांनी प्रचारसभाच न घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्या कोलकत्यात प्रतिकात्मक सभा घेतील. तसेच, राज्यातील इतर ठिकाणच्या सभा ही 30 मिनिटांच्या वेळात आटोपण्यात येणार आहेत. 

निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यास नकार दिला असला तरी प्रचाराची वेळ कमी केली आहे. मतदानाच्या 72 तास आधी प्रचार बंद करण्यात येत आहे. तसेच, सायंकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com