अर्णब गोस्वामी अडचणीत...वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यामागील मुंबई पोलिसांचा ससेमिरा कायम आहे. गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
lawyer prashant bhushan releases whatsapp chat of arnab goswami
lawyer prashant bhushan releases whatsapp chat of arnab goswami

मुंबई : मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक भारत, फक्त मराठी, महा मूव्ही आणि बॉक्‍स सिनेमा या चार चॅनेलचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले होते. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट हे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी उघड केले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांना थेट आव्हान दिले होते. दरम्यान, अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन दिला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली होती. या प्रकरणी अटक झालेले ते पंधरावे आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

आता दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट हे विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी उघड केले आहे. त्यांनी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की, बीएआरसीचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील हे व्हॉट्सअॅप चॅट आहे. यातून अनेक कटकारस्थाने आणि सरकारी यंत्रणांमधील त्यांचा अनिर्बंध शिरकाव समोर येत आहे. प्रसारमाध्यम आणि पदाचा वापर करुन झालेली सत्तेची दलाली यात दिसून येत आहे. देशात कायद्याचे राज्य शिल्लक असेल तर तो आधीच कारागृहात असालयला हवा होता.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दासगुप्ता या प्रकरणातील सूत्रधार आहेत. ते बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना 2016 ते 2019 या काळात हा गैरव्यवहार झाला. दासगुप्ता हे जून 2013 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांना टीआरपी वाढवण्यासाठी गोस्वामी यांच्याकडून लाखो रुपये मिळत होते. याचा फायदा अखेर रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या चॅनलना होत होता. या पैशातून दासगुप्ता हे महागडे दागिने, घड्याळे आदी गोष्टींची खरेदी करीत होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com