संजय राऊतांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल होणार... 

या लेखातील सारी विधानं तथ्यहीन आहेत. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नीरज सिंह यांनी केला आहे.
33sanjay_raut_1.jpg
33sanjay_raut_1.jpg

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. बिहारमधील भाजपचे आमदार आणि सुशांतसिंह राजपूत याचे बंधु नीरजसिंह बबलू हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. संजय राऊत यांनी काल 'सामना'च्या आपल्या 'रोखठोक' या सदरात सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते.

त्यांनी म्हटले होते की सुशांतच्या वडील के.के.सिंह यांनी दुसरे लग्न केलं होतं. सुशांत या लग्नाच्या विरोधात होता. यामुळेच सुशांत आणि त्यांच्या वडिलांचे संबध चांगले नव्हते. पण सुशांतचे मामा आर. सी. सिंह यांनी सुशांत सिंह यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा आरोप खोडून काढला आहे. संजय राउत हे खोटारडे असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. या लेखातील सारी विधानं तथ्यहीन आहेत. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नीरज सिंह यांनी केला आहे. 

'रोखठोक'मध्ये संजय राऊत यांनी असे विधान करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, हे बिहारमधील सगळ्यांना माहित आहे, असे सुशांतसिंह राजपूत याचे मामा आर.सी.सिंह यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या इशारावरून संजय राऊत यांनी हे विधान केलं असल्याचा आरोप आर.पी.सिंह यांनी केला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करू नका, मुंबई पोलिस तपास करण्यास सक्षम आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, त्यांच्या हेतुबदल शंका वाटते, असेही संजय राऊत यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुरू असलेला तपासाबाबत अनेक प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली. 

संजय राऊत म्हणाले, "सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस तपास करीत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत कुणाला संशय घ्यायचा आहे, टिका करायची आहे, त्यांनी ते करावे. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका घेणे चुकीचं आहे. या प्रकरणी चाळीस दिवसानंतर पाटण्यात गुन्हा दाखल होतो. याचा तपास सीबीआयने करावा, यासाठी बिहार सरकारने केंद्रसरकारकडे तगादा लावला होता. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला. हा सारा घटनाक्रम पाहिला तर लक्षात येईल की यामागील सूत्रधार कोण आहे. पडद्यामागून कोण हालचाली करीत आहेत, कोण पटकथा लिहित आहे, हे लवकरच समजेल. कुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल."
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com