मजूर, छोटे व्यावसायिक काश्मीर सोडून पळू लागले!

राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशसह अन्य काही राज्यांमधील हे मजूर आहेत.
Jammu and Kashmir
Jammu and Kashmir

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांची दहशत वाढू लागली आहे. त्यांच्याकडून अन्य राज्यांतून आलेले मजूर व छोट्या व्यावसायिकांना लक्ष्य करत हत्या केली जात आहे. मागील काही दिवसांत 11 नागरिकांची हत्या करण्यात आली असून त्यामध्ये चार बिहारी नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक जण आता काश्मीर सोडून जाऊ लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षानेही या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

काश्मीरमधील कुलगामध्ये रविवारी बिहारमधील तीन नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तर शनिवारी श्रीनगरमधील ईदगाह परिसरात बिहारच्या विक्रेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अरविंद कुमार साह असं त्याचं नाव आहे. तो पाणी पुरी विक्रीचा व्यवसाय करत होता. शनिवारीच दुसऱ्या एका घटनेमध्ये पुलवामामध्ये सगीर अहमद याची हत्या झाली. तो उत्तर प्रदेशातील असून सुतारकाम करत होता.

Jammu and Kashmir
भाजप-आपमध्ये सापशिडीचा खेळ; केजरीवाल साप अन्...

मागील काही दिवसांत काश्मीरमध्ये अकरा नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एक औषध दुकानदारासह दोन शिक्षकांचाही समावेश आहे. आता प्रामुख्याने बाहेरील राज्यांतून काश्मीरमध्ये मजुरी किंवा व्यवसायासाठी आलेल्या नागरिकांची हत्या केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत पाच जणांची हत्या झाली आहे. त्यामुळे अशा नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

या भीतीमुळे अनेकांनी काश्मीर सोडून जाण्यास सुरूवात केली आहे. साधारणपणे हे मजूर दिवाळीमध्ये घरी परततात. पण या हल्ल्यांमुळे ते आताच कुटूंबासह घरी जाऊ लागले आहेत. बिहारचे पंकज पासवान या मजूराने सांगितले की, 'मला 25 ऑक्टोबर रोजी घरी जायचे होते. पण त्याआधीच काश्मीर सोडत आहे. काही लोक आधीच गेले आहेत.' काश्मीरमधील रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच ठिकठिकाणी मजूर एकत्र येत घरी जात आहेत.

राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशसह अन्य काही राज्यांमधील हे मजूर आहेत. या घटनानंतर भाजपच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार यांनीही चिंता व्यक्त केली आहे. याबाबत जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलणे झाले असून चिंता व्यक्त कऱण्यात आली आहे. काही ठराविक लोकांनाच लक्ष्य केलं जात आहे. इतर राज्यांतील मजूरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलली जातील, अशी अपेक्षा असल्याचे नितीश कुमार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com