गांधी हत्येसाठी काँग्रेस मंत्र्यांच्या मेव्हण्यानेच पिस्तूल पुरवला; सावरकर-गांधींच्या पणतूंमध्ये जुंपली

Mahatma Gandhi : पिस्तुलाचे धागेदोरे जेव्हा काँग्रेस पर्यंत गेले तेव्हा या नाथिलाल जैनची साक्ष घेतली नाही.
Ranjit Savarkar, Tushar Gandhi, Latest News
Ranjit Savarkar, Tushar Gandhi, Latest NewsSarkarnama

Mahatma Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.तर राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडू निदर्शने देखील केली जात आहेत.

दरम्यान, महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू तुषार गांधी यांनी नथुराम गोडसे यांना गांधी हत्येसाठी सावरकर यांनी पिस्तूल हे ग्वाल्हेर येथून पुरवले होते,असा खळबळजनक आरोप केला.यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. तर सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनीही या प्रकरणी खळबळजनक दावा केला असून गाधीं हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल हे तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्या मेव्हण्याने पुरवले असल्याचा आरोप केला आहे. यामुळे गांधी आणि सावरकारांच्या वंशजामध्ये हा वाद रंगला आहे. (Ranjit Savarkar, Tushar Gandhi, Latest News)

Ranjit Savarkar, Tushar Gandhi, Latest News
महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी पिस्तूल पुरवले होते.. तुषार गांधींचा गंभीर आरोप

रणजित सावरकर म्हणाले,गांधी हत्येच्या खटल्यात ग्वाल्हेरचे डॉ.परचुरे यांच्यावर असा आरोप ठेवण्यात आला होता की, त्यांनी हे पिस्तूल नथुराम गोडसेंना दिले.आणि ते पिस्तूल परचुरे यांनी जगदीश गोयल यांच्याकडून विकत घेतलं.

याच संदर्भात त्यांचे वकील पु.ल.इनामदार लिखित 'लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी' या पुस्तकातील संदर्भानुसार जगदीश गोयल यांनी ते पिस्तूल नाथिलाल जैन याकडून घेतलं आणि या दोघांना देखील त्या एप्रिल महिन्यात अटक केली आणि या दोघांनाही आपली साक्ष द्यायला आणलेच नाही. त्यात नाथूलाल जैन सोबत ग्वाल्हेर गृहमंत्र्यांचे नाव देखील होते आणि हा नाथिलाल जैन एका काँग्रेसी मंत्र्यांचा मेव्हणा होता.

या पिस्तुलाचे धागेदोरे जेव्हा काँग्रेस पर्यंत गेले तेव्हा या नाथिलाल जैनची साक्ष न घेता हे पिस्तूल कुठून आलं आणि कसे आले याची चौकशी न करता हे प्रकरण गुलदस्तात ठेवले,असे ते म्हणाले.

Ranjit Savarkar, Tushar Gandhi, Latest News
सीमाप्रश्नी मंत्र्यांची समिती नेमताच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला एकनाथ शिंदेंना हा अनाहूत सल्ला!

दरम्यान, पु.ल.इनामदार असे सांगतात की, पुस्तक जर कोणी पुरवले असेल तर एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या मेव्हण्याने पुरवले,आणि ते पिस्तूल त्यांच्याकडे कुठून आलं याचा जाब जर विचारायचा असेल तर तेव्हा काँग्रेसचे शासन होते. तेव्हा हा जाब तुषार गांधी यांनी निश्चित राहुल गांधी याना विचारावा, असे आव्हानही रणजित सावरकर यांनी तुषार गांधींना केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com