मोदी सरकारच्या अडचणीत वाढ! आखाती देशात भारतीय वस्तूंवर बंदी

आखाती देशांकडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न
Indian Priducts at Supermarket (File Photo)
Indian Priducts at Supermarket (File Photo) Sarkarnama

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व मुस्लिम धर्म यांच्याबद्दल भाजप (BJP) नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल म्हणून या दोन्ही नेत्यांना निलंबित केले असले तरी यामुळं मोदी सरकारची (Modi Government) जागतिक पातळीवर कोंडी झाली आहे. यातच कुवेतमध्ये भारतीय वस्तूंवर बंदी घालण्यात येऊ लागली आहे. याचे लोण इतरही देशांत पसरण्याची भीती असून, यामुळं मोदी सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. (In kuwait indian products pulls out from shelves)

कुवेत शहरातील एका सुपरमार्केटमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांची उत्पादने या सुपरमार्केटमध्ये झाकून ठेवण्यात आली आहेत. यावर फलकही लावण्यात आला आहे. आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत, असे त्यावर म्हटले आहे. याचे लोण इतर आखाती देशांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त आहे. यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जाता आहे.

Indian Priducts at Supermarket (File Photo)
मोदी सरकारनं आधी गुडघे टेकले अन् आता कतारसमोर दंडवत! भाजप नेत्याचा घरचा आहेर

याबद्दल या सुपरमार्केटचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासर अल-मुतैरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रेषिताचा अवमान आम्ही कुवेती मुस्लिम कधीही स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सुपरमार्केटने बंदी घातलेल्या वस्तूंमध्ये चहासह इतर उत्पादनांचा समावेश आहे. दरम्यान, अल-अझहर विद्यापीठ या सर्वांत महत्वाच्या मुस्लिम संस्थेने भाजप नेत्यांची विधाने हीच खरा दहशतवाद असल्याची भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या विधानामुळे जगाला ते एका नव्या संकटात आणि युद्धात लोटतील, असा इशाराही दिला आहे.

Indian Priducts at Supermarket (File Photo)
भाजप नेत्यांचा वाचाळपणा अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकार तोंडघशी

भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आखाती देशांमध्ये वाढ होत आहे. कतार, इराण, कुवेतनंतर आता सौदी अरेबियानेही या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. आखाती देशांनी तेथील भारतीय राजदूतांना बोलावून प्रेषित पैगंबराबद्दलच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. भाजप नेत्यांकडूनच अशी विधाने केली जात असल्याने मोदी सरकावर बॅकफूटवर गेले आहे. भारताचे आखाती देशांशी असलेले द्वीपक्षीय संबंध अतिशय महत्वाचे आहेत. यामुळे मोदी सरकारला हे संबंध बिघडणे धोक्याचे आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे कतारच्या दौऱ्यावर असतानाच हा नेमका वाद उफाळून आला आहे. दरम्यान, भाजपने या दोन्ही नेत्यांची हकालपट्टी केल्याबद्दल आखाती देशांनी समाधान व्यक्त केलं आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यानंतर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते. उत्तर प्रदेशातील हिंसाचारात चाळीसहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी सुमारे दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले होते. अखेर भाजपने शर्मांना पक्षातून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं आहे. याचवेळी भाजपने जिंदाल यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com