न्यायालयाचा अवमान संजय राऊतांना भोवणार ? ; जनहित याचिका दाखल

अर्जदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा याचिकेमध्ये प्रतिसादकर्ते म्हणून उल्लेख केला आहे.
sanjay raut
sanjay rautsarkarnama

मुंबई :''न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय.महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी उपस्थित केला होता. न्यायव्यवस्थेवर त्यांनी केलेली टीका त्यांना भोवणार आहे, कारण आता भारतीय बार असोसिएशनने (indian bar association)राऊतांच्या विरोधात अवमान याचिक दाखल केली आहे.

“न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेली आहेत का? दिलासे देण्यासाठी ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का?,” असेही प्रश्न उपस्थित केले. “हे असच सुरु राहिलं तर या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल,” असंही राऊत म्हणाले.

sanjay raut
'अर्धवटराव' म्हणत धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतरांविरोधात जनहित याचिका इंडियन बार असोसिएशनने दाखल केली आहे. “उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींविरोधात खोटे, (प्रतिष्ठेला) कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी” ही याचिका दाखल केली आहे. अर्जदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा याचिकेमध्ये प्रतिसादकर्ते म्हणून उल्लेख केला आहे.

भाजपचे नेत किरीट सोमय्या, नारायण राणे, नितेश राणे, प्रविण दरेकर, अनिल बोंडे आदींना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन न्यायालयाने जामिन देत त्यांना दिलासा दिला आहे. त्यावर राऊतांनी न्यायव्यवस्थेवर संशय व्यक्त करुन गंभीर आरोप केले. न्यायव्यवस्थेचा तराजू हा भंगारमधून घेतला असल्याची टीकाही राऊतांनी केली होती.

sanjay raut
होय,पवारसाहेब खोटं बोलले त्यांचा आम्हाला अभिमान आहे..

न्यायालयकडून केवळ किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांनाच दिलासा देऊन पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार न्यायालये एकीकडे भाजपशी संबंधित लोकांना दिलासा देत आहेत पण शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आरोपींना दिलासा देत नाहीत.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख या तुरुंगात बंद असलेल्या मंत्र्यांना न्यायालयाने कोणताही दिलासा न दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमय्यांना दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही “दिलासा घोटाळा आहे” असं टि्वट केल्याचा संदर्भ देत राऊतांनी प्रश्न उपस्थित केला होता. “मी १०० टक्के सांगतो हा दिलासा घोटाळाच आहे.तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या आणि विशिष्ट विचारांच्या लोकांनाच मिळावा यासाठी न्याययंत्रणेमध्ये एक व्यवस्था काम करतेय,” असं उत्तर राऊतांनी दिलं होतं.

“गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना जे दिलासे मिळतायत भाजपाच्या लोकांना, अगदी दिशा सॅलिअन प्रकरणापासून मुंबै बँक प्रकरणापर्यंत ते आयएनएस विक्रांतच्या निधीचा घोटाळ करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात?,” असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com