चीनकडून युवकाच्या अपहरणानंतर लष्कराच्या मोठ्या हालचाली

अरूणाचल प्रदेशमधून 18 जानेवारी रोजी चीनच्या लष्कराने युवकाचे अपहरण केल्याचा दावा केला जात आहे.
Miram Taron
Miram TaronSarkarnama

नवी दिल्ली : चीनी लष्कराने अरूणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) भारताच्या हद्दीत घुसून एका भारतीय तरुणाचं अपहरण केल्याचा दावा भाजपच्या खासदारांनी केला आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने (Indian Army) याची तातडीने दखल घेत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी (PLA) संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिली.

चीनने 2018 मध्ये भारताच्या सीमेवर 3 ते 4 किमोमीटर रस्ता तयार केला होता. तिथूनच तरूणांच अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. त्याचा एक मित्र चीनी लष्कराच्या तावडीतून निसटल्यानंतर त्याने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर भाजपचे अरूणाचल प्रदेशमधील खासदार तापिर गाओ (Tapir Gao) यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. गाओ यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Miram Taron
बिपिन रावत यांचे बंधू निवडणुकीच्या मैदानात? घेतला मोठा निर्णय

लष्करातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पीएलएशी संपर्क साधत या घटनेबाबत माहिती दिली आहे. एक व्यक्ती वनौषधी गोळा करण्यासाठी गेली होती. पण ती परत आली नाही. त्या व्यक्तीचा शोध लागत नाही. पीएलएने आपल्या भागात या व्यक्तीचा शोध घेवून प्रोटोकॉलनुसार भारताला सोपवावे, असं पीएलएला सांगण्यात आल्याचे लष्करातील सुत्रांनी सांगितले.

ही घटना अपर सिंयांग जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. चीनी पीएलएने मंगळवारी जिदो गावांतील 17 वर्षीय मिराम तारोन याचे भारतीय (India) हद्दीतील लुंगटा जोर क्षेत्रातील बिशिंग गावातून अपहरण केले आहे. हा भाग अरूणाचल प्रदेशातील अपर सियांग जिल्ह्यातील आहे. त्याचे पीएलएच्या तावडीतून निसटले आणि अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या यंत्रणांनी त्याच्या सुटकेसाठी ताडीने पावले उचलावती, अशी विनंती दाओ यांनी केली आहे.

दाओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृह मंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मीन आणि भारतीय लष्कराला तरूणाच्या सुटकेसाठी आवाहन केले आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चीनमधील नागरी मंत्रालयाने अरूणाचलमधील 15 ठिकाणांची नावे बदल्याचे समोर आले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला होता. बीजिंगचे हे पाऊल सत्य बदलू शकत नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न भाग आहे, हेच सत्त आहे, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com