अखेर ठरलं! राज्यसभेवर पाच जणांची होणार बिनविरोध एंट्री

राज्यसभा निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापलं
Rajya Sabha Election
Rajya Sabha Election Sarkarnama

पाटणा : राज्यसभा निवडणुकीमुळं (Rajya Sabha Election) देशातलं वातावरण तापलं आहे. असे असतानाही बिहारमध्ये पाच जण बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यात राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कन्या मिसा भारती (Misa Bharti) आणि माजी आमदार फैयाज अहमद (Faiyaz Ahmad) यांचा समावेश आहे. याचबरोबर भाजपचे दोन जण आणि संयुक्त जनता दलाचा एक उमेदवार बिनविरोध राज्यसभेत दाखल होणार आहेत. (Rajya Sabha Election News)

बिहार विधानसभेतील संख्याबळ पाहता आरजेडी आणि भाजपला प्रत्येकी दोन आणि जेडीयूला एक जागा मिळेल, असे चित्र होते. त्यानुसार आरजेडीने मिसा भारती आणि फैयाज अहमद हे दोन उमेदवार दिले होते. भाजपने (BJP) शंभूशरण पटेल आणि सतीशचंद्र दुबे यांना उमेदवारी दिली होती. संयुक्त जनता दलाने (JDU) खिरू महातो यांना उभे केले होते. राज्यसभेच्या पाच जागांसाठी पाचच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूकही टळली. मिसा भारती आणि सतीशचंद्र दुबे हे दुसऱ्यांदा राज्यसभेत जात आहेत. तर, खिरू महातो, फैयाज अहमद आणि शंभूशरण पटेल हे पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत.

Rajya Sabha Election
राज्यसभेला सहावा उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार! बाळासाहेब थोरातांनी सांगितलं गणित

लालूंचा कोट्यधीश उमेदवार

आरजेडीच्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर लालूंनी शिक्कामोर्तब केले होते. यात मिसा भारती आणि फैयाज अहमद यांचा समावेश होता. मिसा भारती या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली. फैयाज आरजेडीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा समावेश राज्यातील कोट्यधीश नेत्यांत आहे. ते २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत बिस्फी येथून लढले होते. पण भाजपच्या हरिभूषण ठाकूर बचौल यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

Rajya Sabha Election
आधी हरलेल्या मुख्यमंत्र्यांनी विक्रमी विजय मिळवताच पंतप्रधान मोदी म्हणाले...

नितीशकुमारांचा केंद्रीय मंत्र्यालाच डच्चू

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विश्‍वासू सहकारी व केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांना डावलून झारखंडचे जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष खिरू महातो यांना संधी दिली. सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं आता त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदावरही गंडांतर आलं आहे. यामुळे आगामी काळात मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल करावे लागणार आहेत. मागील काही काळापासून सिंह यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. ते भाजपची मुक्तकंठाने स्तुती करताना दिसत होते. त्यामुळं नितीश यांनी सिंह यांना डच्चू देऊन महातोंना उमेदवारी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com