Congress : राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वात आधी करणार 'हे' काम; त्यांनी स्वत:च सांगितलं...

Rahul Gandhi News : 'मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी तीन कामं करेन...'
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi Latest NewsSarkarnama

Rahul Gandhi News : काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात आधी काय कराल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर 'मी पंतप्रधान झालो तर सर्वात आधी तीन कामं करेन, असं सांगत राहुल गांधींनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांचा उत्तरं दिली.

शिक्षण व्यवस्थेत बदल, परराष्ट्र धोरणाबाबत चांगले निर्णय, रोजगार मिळण्यासाठी तरुणांच्या कौशल्यावर काम, अशा अनेक विषयावर काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) सध्या १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या, तरुणांच्या तसेच अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक मुद्यावर त्यांनी भाष्य केलं.

Rahul Gandhi Latest News
Abdul Sattar : माझ्याच पक्षातील नेते...; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात खळबळ

पंतप्रधान झालात तर सर्वात आधी काय कराल? असा प्रश्न आज पत्रकारांनी राहुल गांधींना विचारला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, ''पहिलं तर देशातील शिक्षण व्यवस्थेत बदल घडवणार आहे. कारण सध्या देशातील शैक्षणिक धोरणार काम कराण्याची गरज आहे. शिक्षण यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्यामुळे मुलांना व्हिजन मिळत नाही. त्यामुळे या व्यवस्थेवर आणि मुलांना व्हिजन देण्यावर काम करेल'', असं ते म्हणाले.

त्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलं की, ''शिक्षण व्यवस्थेबरोबर तरुणांच्या कौशल्यावर काम करेल. कारण त्यांना रोजगार द्यायचा असेल तर तरुणांच्या कौशल्यावर काम करण्याची गरज आहे. तरुणांच्या कौशल्याचा आदर केल्याशिवाय त्यांना रोजगार देऊ शकत नाही. त्यामुळे यावर काम करेल'', असं ते म्हणाले.

Rahul Gandhi Latest News
Chandrashekhar Bawankule यांनी अजित दादांना पुन्हा डिवचले; म्हणाले, होय धर्मवीरच !

देशातील शिक्षण व्यवस्था, तरुणांच्या कौशल्यावर काम आणि तिसरं त्यांनी सांगितलं की, ''सध्या देशाचे परराष्ट्र धोरण खूप गोंधळात टाकणारे आहे. त्यावर काम करण्याची गरज आहे. आपल्या देशात बंधुता, एकता आणि प्रेमाची भावना पसरवायची आहे. कारण देशाच्या सीमावर त्यांचा परिणाम होत असतो. हिंसाचार आणि द्वेषाचा परिणाम दुसरे देश पाहतात आणि त्याचाच ते फायदा घेतात, त्यामुळे यावर काम करण्याची गरज आहे'', असं राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यावेळी प्रश्नांची उत्तरं देताना सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com