लखनौ : हाथरस येथील बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना राज्य सरकारने 'नो एंट्री' केली आहे. आता प्रसारमाध्यमांनी हाथरसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. एसआयटी तपासाचे कारण यासाठी यासाठी पुढे करण्यात आले आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उलट विरोधकांनाच धारेवर धरले असून, उत्तर प्रदेश पोलिसांची पाठराखण केली आहे.
हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार नराधमांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी काल कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. णमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना महिला पोलिसांनी आमचे कपडे फाडले आणि आमच्या नेत्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीहल्ला केला. पुरुष पोलिसांनीही महिलांना धक्काबुक्की केली. ही घटना लाजीरवाणी आहे.
आता या प्रकरणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील घटना दुर्दैवी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीसाठी एसआयटी स्थापना केली आहे. या प्रकरणी बलात्कार झाला होता की नव्हता हे सांगण्याचे काम उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे.
राजस्थानमधील कथित बलात्कार प्रकरणारवरुन प्रसाद यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले की, राजस्थानमधील बलात्कार प्रकरणी काँग्रेसने गप्प राहण्याचे धोरण स्वीकारल आहे. राहुल आणि प्रियंका गांधी तेथील घटनेवर काहीच बोलत नाही. परंतु, हाथरस प्रकरणावरुन नाटक करीत आहेत.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.