दिग्विजयसिंहांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न विचारला की समजायचं भाजपच जिंकणार..!

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणार पोटनिवडणुका झाल्या आहेत. या पोटनिवडणुकांत भाजपने काँग्रेसवर आघाडी घेतल्याचा कल दिसत आहे.
If Digvijaya Singh questions EVMs it means BJP is winning says bjp leader
If Digvijaya Singh questions EVMs it means BJP is winning says bjp leader

भोपाळ : मध्य प्रदेशातील मिनी विधानसभा ठरलेल्या 28 मतदारंसघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 17 जागांवर पुढे असून, काँग्रेस 7 तर बहुजन समाज पक्ष एका जागेवर पुढे  आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. याचा समाचार मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी घेतला आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांची मतमोजणी आज सुरू आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 25 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर उभे असून, तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका झाल्या. 

एक्झिट पोलनुसार, भाजपला 28 पैकी 17 जागा मिळतील. काँग्रेसला 11 जागा मिळतील, असा अंदाज होता. याचा फटका जोतिरादित्य शिंदे यांचा समर्थक आमदारांना बसेल, अशी शक्यता होती. कमलनाथ हे जोतिरादित्य शिंदे यांना धक्का देण्यात यशस्वी ठरतात का याचीही उत्सुकता होती. याचबरोबर ते  शिवराजसिंहाच्या खुर्चीला धक्का देतात का याकडेही लक्ष लागले होते. 

पोटनिवडणुकांतील मजमोजणीचा प्राथमिक कल पाहता भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप 17, काँग्रेस 9 आणि बहुजन समाज पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. यावरुन आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिग्विजयसिंहाना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न विचारले की समजायचे भाजप जिंकत आहे. भाजप हरणार नाही. तुम्ही हरणाऱ्या लोकांना विचारा. आम्ही येथे आमचे संख्याबळ वाढवत आहोत. आम्ही स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नागरिक (दिग्विजयसिंह, कमलनाथ) यांना लवकरच दिल्लीला हलवण्यात येईल. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ 230 आहे. भाजपचे 107 आमदार असून, काँग्रेसचे 87, अपक्ष 4, बहुजन समाज पक्षाचे 2 आणि समाजवादी पक्षाचा 1 आमदार आहे.  

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com