न्यायाधीश हत्या प्रकरणी सीबीआय अडचणीत! उच्च न्यायालयानं घेतलं फैलावर

न्यायाधीशांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने आज सीबीआयला फैलावर घेतले.
Judge Uttam Anand
Judge Uttam AnandFile Photo

नवी दिल्ली : झारखंडमधील धनबादमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना जिल्हा न्यायाधीशांची हत्या (Judge Killing) करण्यात आली होती. याची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्वत:हून दखल घेतली होती. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) तपास देण्यात आला आहे. या तपासावरून आज झारखंड उच्च न्यायालयाने आज सीबीआयवर ताशेरे ओढले.

सीबीआय तपासावर आज उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाती आरोपींच्या नार्को टेस्टचे अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोबाईल चोरीसाठी न्यायालयाने हत्या झाल्याचा दावा सीबीआयने न्यायालयाला सांगितले. यावर नाराजी व्यक्त करीत उच्च न्यायालयाने सीबीआयला झापले. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे.

न्यायालय म्हणाले की, या प्रकरणाच्या तपासात नवीन काहीही समोर आलेले नाही. तुम्ही दरवेळी नवीन कोणतातही अँगल समोर आणून हे प्रकरण लांबवत चालला आहात. मोबाईल चोरीसाठी न्यायाधीशांची हत्या झाल्याचे सीबीआय म्हणत आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून तर वेगळेच चित्र दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार न्यायाधीशांची जाणीवपूर्वक हत्या झाल्याचे दिसत आहे.

Judge Uttam Anand
रेल्वे दुर्घटनेमागील कारण काय? रेल्वेमंत्र्यांनी दिलं उत्तर

झारखंडमधील धनबाद येथे जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद (Uttam Anand) यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना गेल्या वर्षी 28 जुलैला सकाळी घडली होती. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करण्यास विलंब केल्याने सुरूवातीला या घटनेचे गांभीर्य समोर आले नव्हते. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने न्यायाधीश आनंद यांना धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश आनंद हे पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते रस्त्याचे कडेने चालत होते. त्याचवेळी काही अंतरापर्यंत रस्त्याच्या मधून जाणारी रिक्षा न्यायाधीशांच्या जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या दिशेने वळते आणि थेट त्यांना धडक देऊन पुढे निघून जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हत्येच्या उद्देशानेच रिक्षा धडकवण्यात आल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते.

Judge Uttam Anand
लॉकडाऊनचा भंग करणाऱ्या पंतप्रधानावर 'या' देेशात येऊ शकते राजीनाम्याची वेळ

न्यायाधीश आनंद हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्यानेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तास त्यांची ओळखच पटली नाही. सकाळचे सात वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर रुग्णालयात अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला होता. उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर संपूर्ण न्यायव्यवस्थाच हादरून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर उपस्थित केला होती. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा होती. नंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com