आमदाराने आधी दिल्या शिव्या अन् नंतर मागितली माफी!

हरियानातील भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांना आमदाराने शिवीगाळ केल्यावरुन वाद सुरू झाला आहे.
haryana jjp mla devender babli apologizes to farmers
haryana jjp mla devender babli apologizes to farmers

नवी दिल्ली : हरियानात (Haryana) कृषी कायद्यांना विरोध करत सत्ताधारी आमदाराच्या (MLA) घराला घेराव घातल्याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना (Farmers) पोलिसांनी अटक केली होती. या आमदाराने शेतकऱ्यांना शिवीगाळ केली होती. यामुळे शेतकरी संघटनांना तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोर (Police Station) आंदोलन सुरू केले आहे. अखेर या आमदाराने विनाशर्त माफी मागितली आहे. 

जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार देवेंदरसिंह बबली यांच्या घराला 1 जूनला शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन होते. यानंतर शेतकरी आंदोलक विकास सिसर आणि रवि आझाद यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. दरम्यान, आमदार बबली यांनी आम्हाला शिवीगाळ केली, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. 

याबद्दल आमदार बबली यांनी अखेर माफी मागितली आहे. बबली म्हणाले की, मी एका सरकारी बैठकीसाठी जात होतो त्यावेळी माझ्यावर काही जणांनी हल्ला केला. हल्ला करणारे शेतकरी असतील यावर माझा विश्वास नाही. संतापाच्या भरात माझ्याकडून काही चुकीचे शब्द उच्चारले गेले. याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होईल. 

शेतकरी नेते राकेश टिकैत, गुरनामसिंह चाडुनी, योगेंद्र यादव यांनी फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. याचबरोबर आज राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने शेतकरी नेत्यांशी चर्चा केली आणि दोन्ही शेतकऱ्यांना सोडले. यानंतर राज्यभर पोलीस ठाण्यांना घेराव घालण्याचे आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. 

तोहाना सदर पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन शेतकऱ्यांनी कायम ठेवले आहे. याबद्दल राकेश टिकैत म्हणाले की, आणखी एक शेतकरी माखन सिंह हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुटका करावी आणि त्याच्यावरील गुन्हा रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिस्सार येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी येणार असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होतेय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा सरकारने केली होती. आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला सरकारी नोकरीही देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com