धोका वाढला..! एका पाठोपाठ एक भाजपशासित राज्यांत रात्रीची संचारबंदी

कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढले आहे.
Night Curfew

Night Curfew

Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे सुरवातीला मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) रात्रीच्या संचारबंदीची (Night Curfew) घोषणा केली होती. यानंतर उत्तर प्रदेशने (Uttar Pradesh) रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. आता पाठोपाठ हरियानानेही (Haryana) हाच निर्णय घेतला आहे. एकापाठोपाठ तीन भाजपशासित राज्यांनी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.

हरियाना सरकारने आज रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत असणार आहे. ती आज रात्रीपासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही घोषणा केली आहे. मॉल, रेस्टॉरन्ट, भाजी मंडई, धान्य बाजार आणि कार्यालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना व्यक्तींनाच प्रवेश असेल. याचबरोबर दोनशेपेक्षा जास्त जण सहभागी होतील, अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

देशभरात ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. ही संचारबंदी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सरकारने खबरदारी म्हणून आतापासूनच निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Night Curfew </p></div>
राहुल गांधींना भेटला अन् बडा नेता म्हणाला, मीच नेतृत्व करणार पण मुख्यमंत्रिपदाचं नंतर बघू!

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढलेला असताना राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कठोर निर्बंध घातले आहेत. दोनशेपेक्षा जास्त लोकांना विवाह आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यात कोरोनाविषयक सर्व उपाययोजना पाळाव्या लागतील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मास्क नसेल, तर ग्राहकांना वस्तू न देण्याचे आवाहन केले आहे.

<div class="paragraphs"><p>Night Curfew </p></div>
भाजपपेक्षा तृणमूल वाईट! नेत्यानं पक्ष सोडताना ममतांना आणलं अडचणीत

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकारही यामुळे खडबडून जागे झाले आहे. अनेक राज्यांनी निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. दिल्ली सरकारने नाताळ आणि नववर्षाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णसंख्या आता 358 झाली आहे. देशातील 17 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. मागील 24 तासांत देशात 122 रुग्ण सापडले आहेत. ओमिक्रॉनचे आतापर्यंत 114 रुग्ण बरे झालेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 88 रुग्ण आहेत. यानंतर दिल्ली 67 आणि तेलंगण 38, तमिळनाडू 34, कर्नाटक 31 आणि गुजरात 30 अशी रुग्णसंख्या आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com