पक्षांतर्गत वाद उफाळला अन् काँग्रेसचे प्रभारी म्हणाले, मला ही जबाबदारीच नको!

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे.
harish rawat says relieve me from punjab congress in charge post
harish rawat says relieve me from punjab congress in charge post

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस हाय कमांडने यावर काढलेला तोडगा तकलादू ठरला आहे. यातच आता काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंतीच थेट पक्ष नेतृत्वाला केली आहे. 

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांच्यात वाद सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्व करीत आहे. ही सर्व जबाबदारी प्रभारी या नात्याने रावत यांच्यावर आहे. रावत यांनी आता ही जबाबदारी नको, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी रावत यांनी उत्तराखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीचे कारण दिले आहे. पंजाबमध्येही पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे.  

रावत हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंडमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. याबद्दल रावत यांनी म्हटले आहे की, पंजाब काँग्रेसच्या प्रभारीपदातून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाकडे केली आहे. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा मी प्रचारप्रमुख आहे. मला आता उत्तराखंडवर लक्ष द्यायचे आहे. पक्षाने सांगितल्यास मी सध्याची जबाबदारी पार पाडत राहीन. 

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनीही सल्लागारांवरून सिद्धू यांना तंबी दिली होती. ते म्हणाले होते, सल्लागारांच्या विधानांना संपूर्ण पक्ष आणि राज्याचा आक्षेप आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही पक्षाची भूमिका आहे. हे सल्लागार पक्षाने नेमलेले नाहीत. त्यांना काढून टाकण्यासाठी आम्ही सिद्धू यांना सूचना केलेली आहे. त्यांनी असे न केल्यास आम्ही सल्लागारांची हकालपट्टी करू. पक्षाला अडचणीत आणणारे लोक आम्हाला नको आहेत. 

प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच सिद्धू यांनी चार सल्लागारांची नेमणूक केली होती.  त्यापैकी प्यारेलाल गर्ग व मलविंदर माली यांनी नुकतेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. माली यांनी मागील आठवड्यात काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणले होते. तर गर्ग यांनी थेट अमरिंदरसिंग यांनी पाकिस्तानवर केलेल्या टीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दोन्ही सल्लागारांची वक्तव्य समोर आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com