Gujarat Election 2022 : भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी गुजरातच्या मैदानात, कारण...

Gujarat Election 2022 | महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या प्रवासानंतर राहुल गांधी दोन दिवस विश्रांती घेणार आहे. या काळातही ते गुजरात दौऱ्यावर पोहचले आहेत.
 Gujarat Election 2022
Gujarat Election 2022

Gujarat Election 2022 : भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेत काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. गुजरात राज्याच्या विधानसभा जाहीर झाल्याने राहुल गांधी दोन दिवसांसाठी भारत जोडो यात्रेून विश्रांती घेत आज गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. या ठिकाणी आज त्यांच्या दोन सभा होणार असून पहिली दुपारी दोन वाजता सुरतमध्ये आणि दुसरी संध्याकाळी सव्वाचार वाजता ही राजकोटमध्ये प्रचारसभा घेणार आहे.

काल (२० नोव्हेंबर) पंतप्रधानांनी केलेल्या कालच्या टीकेवर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि 'भारत जोडो यात्रे'वर टीकास्त्र सोडले होते. 'ज्यांनी मागील तीन दशकांपासून नर्मदा धरणाच्या कामाला रोखून धरलं, त्याच महिलेसोबत काँग्रेस नेते पदयात्रा करत आहेत.' अशा शब्दात मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

 Gujarat Election 2022
राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचं 'धोतर फेडो' आंदोलन

मेधा पाटकर नर्मदा धरण प्रकल्पाला मागील तीन दशकापासून विरोध करत आहेत. २०१७ साली भाजपने सरदार सरोवर प्रकल्पाचं उद्घाटन केलं तेव्हा या प्रकल्पामुळे हजारो आदिवासी विस्थापित होऊ शकतात, असा पवित्रा घेत पाटकर यांनी नर्मदा प्रकल्पाला विरोध केला. या प्रकल्पात सतत कायदेशीर अडथळे निर्माण केले गेल्याने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचं बांधकाम थांबलं. मेधा पाटकर यांनी गुजरातची बदनामी केल्याचाही आरोप भाजपकडून सतत केला जात होता.

मेधा पाटकर नर्मदा धरण प्रकल्पाला मागील तीन दशकापासून विरोध करत आहेत. २०१७ साली भाजपने सरदार सरोवर प्रकल्पाचं उद्घाटन केलं तेव्हा या प्रकल्पामुळे हजारो आदिवासी विस्थापित होऊ शकतात, असा पवित्रा घेत पाटकर यांनी नर्मदा प्रकल्पाला विरोध केला. या प्रकल्पात सतत कायदेशीर अडथळे निर्माण केले गेल्याने नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाचं बांधकाम थांबलं. मेधा पाटकर यांनी गुजरातची बदनामी केल्याचाही आरोप भाजपकडून सतत केला जात होता.

याची आठवण करुन देत पंतप्रधानांनी त्यांच्यावर टिका केली. ''नर्मदा धरणाच्या विरोधात असलेल्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही पदयात्रेत कसे सहभागी झाले होते, असा सवाल काँग्रेसला विचारा, नर्मदा धरण बांधले नसते तर काय झाले असते? असा सवाल राहुल गांधींना विचारा, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in