राज्यपालांनी हात जोडूनही थांबले नाहीत भाजप आमदार अन् भाषण न करताच जावे लागले!

भाजप व सत्ताधारी आमदारांच्या गदारोळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही सेकंदातच आपले भाषण आटपावे लागले होते.
West Bengal Assembly
West Bengal AssemblySarkarnama

कोलकता : महाराष्ट्र विधीमंडळाच्या (Maharashtra assembly) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीला भाजप (BJP) व सत्ताधारी आमदारांच्या गदारोळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही सेकंदातच आपले भाषण आटपावे लागले होते. आता पश्चिम बंगाल विधानसभेतही सोमवारी भाजप आमदारांच्या गदारोळामुळे राज्यपालांना भाषण न करताच परत जावे लागल्याचा प्रकार घडला आहे.

पश्चिम बंगालचे (West Bengal) विधानसभा अधिवेशन मध्यरात्री दोन वाजता घेण्यावरून मोठा वाद रंगला होता. पण राज्यपालांनी माघार घेत मंत्रिमंडळाच्या नव्या प्रस्तावावर मोहोर उमटवली अन् सोमवारी दुपारी 2 वाजता अधिवेशनाला (Assembly Session) सुरूवात झाली. पण अधिवेशनाला सुरूवात होताच भाजप आमदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करून जोरदार गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

West Bengal Assembly
फडणवीसांना राष्ट्रवादीच्या आमदारांची साथ; पोलीस अधिक्षकांवर कारवाईची गृहमंत्र्यांची घोषणा

गदारोळामुळे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांना भाषण करता आले नाही. त्यांनी आमदारांना दोनवेळा हात जोडले. पण भाजपच्या आमदारांनी माघार घेतली नाही. आमदारांचा आक्रमक पवित्रा पाहून धनखर यांना भाषण न करताच परत जावे लागले. राज्यपाल परत जात असताना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे (Trinamool Congress) आमदार व खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यानंतर राज्यपालांनी पुन्हा भाजप आमदारांना विनंती केली. पण गोंधळ सुरूच राहिल्याने ते परत गेले.

अधिवेशनावरून झाला होता वाद

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांना समंतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावामध्ये टायपिंगच्या चुकीमुळे 7 मार्च रोजी 2 पीएमऐवजी 2 एम असे टाईप करण्यात आले होते. त्या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन 7 मार्चला मध्यरात्री 2 वाजता होणार होते. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले होते. मात्र, रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा हा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज पहाटे 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल, असेही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना राज्यपाल यांनी राज्यघटनेचे कलम 174 अन्वये सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे राजभवनाच्या वतीने सांगण्यात आले होते. यावर विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी म्हटले होते की, ही टायपिंगची चूक आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती. राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिले होते. मात्र, त्या ठिकाणी चुकीने पहाटे 2:00 पर्यंत झाले. राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com