मोठी बातमी : द्रेशद्रोहाच्या कायद्यात बदल होणार? मोदी सरकारचा दोन दिवसांतच यू-टर्न

इंग्रजांच्या काळातील देशद्रोहाच्या कायद्यात बदल करण्याची गरज नसल्याचे मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगितले जात होते.
PM Narendra Modi, Supreme Court Latest Marathi News
PM Narendra Modi, Supreme Court Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : इंग्रजांच्या काळातील देशद्रोहाच्या कायद्यात बदल करण्याची गरज नसल्याचे मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगितले जात होते. पण दोन दिवसांतच सरकारने आपली भूमिका बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारने यू-टर्न घेत या कायद्यातील तरतुदींबाबत पुनर्विचार करू, असं न्ययालयात सांगितले आहे. त्यामुळे या कायद्यात बदल होणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Supreme Court latest Marathi News)

देशद्रोहाच्या कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, अरूण शौरी, माजी लष्करी अधिकारी आणि महुआ मोईत्रा यांच्या याचिका आहेत. त्यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (N. V. Ramana), न्यायाधीश सुर्यकांत आणि न्यायाधीश हेमा कोहली यांच्या खंडपीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. (Modi Government Latest Marathi News)

PM Narendra Modi, Supreme Court Latest Marathi News
राज्य कसं चालवायचं, हे ठाकरेंनी फडणवीसांकडून शिकावं! नवनीत राणांचा पुन्हा हल्लाबोल

सुरूवातीला केंद्र सरकारने या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे न्यायालयात सांगितले होते. तसेच या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावाव्यात, अशी मागणीही सरकारने केली होती. यानंतर दोनच दिवसांत सरकारने यू-टर्न घेतला आहे. सरकारने सोमवारी नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यामध्ये कायद्याचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची भावना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुरदृष्टी यातून केंद्र सरकारने देशद्रोहाच्या कायद्यातील तरतुदींचे पुनर्निरीक्षण आणि पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे,' असं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानेच या कायद्याबाबत नियमावली तयार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

PM Narendra Modi, Supreme Court Latest Marathi News
राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत; न्यायालयाने बजावली नोटीस

राणा दाम्पत्यावरील कारवाईही चर्चेत

मागील आठवड्यात न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याचाही उल्लेख करण्यात आला होता. वेणुगोपाल यांनी हा मुद्दा उचलला होता. हनुमान चालीसा पठण केल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना कालच जामीन मिळाला आहे. त्यामुळे न्यायालयाने देशद्रोहाच्या कायद्यावर नियमावली बनविण्याची गरज आहे, वेणुगोपाल म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com