गुलाब नबी आझादांची पुढील राजकीय वाटचाल ठरली..केली मोठी घोषणा...

Ghulam Nabi Azad : राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले आहे.
Ghulam Nabi Azad Latest News
Ghulam Nabi Azad Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस (Congress) पक्षाचा सर्वात मोठा चेहरा समजले जाणारे गुलाब नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी कॅाग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चार्चाही सुरू होत्या मात्र, त्यांनी आपली पुढील वाटचाल काय असेल याबाबत स्पष्ट केले आहे. (Ghulam Nabi Azad Latest News)

Ghulam Nabi Azad Latest News
Breaking | गुलाम नबी आझाद यांचा कॉंग्रेसला रामराम

आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, आता मी जम्मू-काश्मीरमध्ये परतणार असून तिथेच मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. भाजपामध्ये आपण प्रवेश करणार हे वृत्तही त्यांनी यावेळी फेटाळून लावले. ते म्हणाले की, माझ्या विरोधत गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात असून चर्चा केल्या जात आहेत. याबरोबरच मला भाजपकडून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते, अशी खोचक टीकाही त्यांनी माध्यमांवर केली.

गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद आणि वेदना व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता हे दोन्हीही गमावले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू केले पाहिजे, असा खोचक सल्लाही दिला आहे.

Ghulam Nabi Azad Latest News
'RSS' च्या संमतीनेच गडकरींचा पत्ता कट...

दरम्यान, आझाद यांनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला. म्हणजे २०१३ मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले आहे. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले, असा आरोपही त्यांनी केला. याबरोबरच राहुल गांधी यांच्याकडे कमी अनुभव असलेल्या लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेले आहेत. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी या केवळ नाममात्र असून सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जातात. यापेक्षा वाईट शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत असल्याची टीकाही आझाद यांनी घेतली आहे. आता आझाद आपल्या पक्षाची कधी स्थापना करतात आणि काय नाव देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com