आता आरपार...सरकारकडून गोळी तरी खाऊ नायतर शांततापूर्ण तोडगा तरी मिळवू

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे मोदी सरकारची कोंडी झाली आहे.
farmer organisations say we will take bullet or peaceful solution from government
farmer organisations say we will take bullet or peaceful solution from government

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी नेत्यांसोबत आज चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने चर्चेची पुढील फेरी 3 डिसेंबरला होणार आहे. आता मागे न हटण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची शेतकरी नेत्यांसोबत विज्ञान भवनात चर्चा केली. या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीस समिती नेमण्याची तयारी सरकारने दाखवली. मात्र, शेतकरी संघटनांनी समितीचा प्रस्ताव धुडकावून लावला. आता चर्चेची फेरी 3 डिसेंबरला होणार आहे. 

शेतकरी संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे आंदोलनाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, आमचा कृषी कायद्यांविरोधातील लढा सुरूच राहील. आम्ही सरकारकडून एकतर गोळी खाऊ अथवा शांततापूर्ण तोडगा मिळवू. आता चर्चेची पुढील फेरी होईल. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला होता. काही शेतकरी संघटना बुराडी मैदानावर असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com